एक्स्प्लोर

मोठी बातमी! मंत्रालयाला घेराव घालण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले; अमरावतीत वातावरण तापलं

Amravati : अमरावती पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 

अमरावती : मुंबईत (Mumbai) मंत्रालयाला घेराव करण्यासाठी निघालेले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पोलीसांनी अमरावतीत (Amravati) अडवले आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी काल रात्री 10 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या, त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी तुकडोजी महाराज मंदिरात रात्र काढली. विशेष म्हणजे, मुंबईत जाण्यापासून रोखण्यात आल्याने मोर्शी येथील शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्त आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्यासाठी निघाले आहेत. तर दुसरीकडे अमरावती पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा धरणात परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या. यावेळी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना मोबदला आणि शासकीय नोकऱ्या देण्यात आल्या नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर, आपल्या प्रलंबित मागण्यासाठी आपण मुंबईत धडक देऊन मंत्रालयाला घेरावा घालणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु, पोलिसांनी शेतकऱ्यांना अमरावतीतच अडवले आहे. त्यामुळे शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून आता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. 

आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले...

दरम्यान, शेतकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रकल्पग्रस्त आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व गेटवर पोलीस तैनात असल्याचे चित्र आहे. आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ देणार नाही अशी भूमिका पोलिसांची आहे. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते...

विशेष आपल्या मागण्यासाठी याच आंदोलक शेतकऱ्यांनी यापूर्वी मुंबई मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केले होते.  त्याच्या या आंदोलनामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली होती. अक्षरशः पोलिसांना स्वतः मंत्रालयाच्या जाळ्यावर उतरून आंदोलकांना ताब्यात घ्यावे लागले होते. दरम्यान, आता पुन्हा शेतकऱ्यांनी मंत्रालयाला घेराव घालणार असल्याचा इशारा दिल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी या आंदोलकांना मुंबईला जाण्यापासून रोखले आहेत. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त...

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मागच्यावेळी मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारून आंदोलन केल्याची घटना लक्षात घेता अमरावती पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्वच गेटवर पोलीस तैनात असून, अधिकारी आणि कर्मचारी यांचे ओळखपत्र पाहून त्यांना आतमध्ये सोडले जात आहे. तसेच, आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

भविष्यात मला कितीही त्रास झाला, अटक झाली तर मी ठाकरेंची साथ सोडणार नाही, ACB चौकशीवर राजन साळवींचे स्पष्ट बोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget