एक्स्प्लोर

Ahilyanagar News : मोठी बातमी : अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या मागणीला पुन्हा जोर, 'महाराष्ट्र केसरी'च्या मातीपूजन कार्यक्रमात मागणी!

Ahilyanagar News : क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय.

अहिल्यानगर : क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर (Ahilyanagar News) जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मातीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले (Shivaji Kardile) यांनी याबाबत वक्तव्य केलंय.

अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. दक्षिण अहिल्यानगर जिल्हा आणि उत्तर अहिल्यानगर जिल्हा. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या तुलनेत दक्षिण अहिल्यानगर जिल्हा तसा अवर्षणप्रवण क्षेत्र असलेला जिल्हा. सर्वच धरणं ही उत्तरेकडे आहेत. तसेच शिर्डी, शनिशिंगणापूरसारखी दोन मोठी देवस्थानं असल्याने उत्तर नगर जिल्ह्याचा विकास अधिक झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विमानतळ तेही शिर्डी म्हणजेच अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात आहे. त्यातच राजकीयदृष्टया देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तरेला नेहमीच झुकतं माप मिळतं. मंत्री पदाचे वाटप असो की पक्षातील मोठ्या जबाबदाऱ्या या उत्तरेकडे जास्त मिळतात. त्यात राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, दिवंगत मधुकर पिचड, बाळासाहेब विखे यांच्यासारख्या उत्तरेतील अनेकांनी मंत्रिपदं उपभोगली. मात्र दक्षिणेकडे राम शिंदे, बबनराव पाचपुते, अनिल राठोड, शिवाजी कर्डीले यांच्या वाट्याला कमी काळासाठी मंत्रिपदं आली. त्यातच शिर्डी देवस्थान उत्तरेकडे असल्याने राज्यातीलच नाही तर देशातील अनेक मोठ्या नेत्यांचा राबता हा उत्तर नगर जिल्ह्यातच असतो. नुकतेच शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन झाले, त्यामुळे देशभरातील अनेक नेत्यांनी उत्तर नगर जिल्ह्याचा दौरा केला. 

अहिल्यानगर जिल्हा विभाजनाच्या मागणीला पुन्हा जोर

हाच धागा पकडत भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी शिर्डीप्रमाणे दक्षिण नगर जिल्ह्यातही एखादं मोठं देवस्थान उभारावं लागेल म्हणजे आमच्याकडेही मोठं मोठे नेते येतील, असं म्हटलं आहे. तर आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील जिल्हा विभाजनाची मागणी पुन्हा एकदा केली आहे. जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी जिल्हा विभाजन झालंच पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांवर अन्याय? 

अहिल्यानगर जिल्ह्यात समतोल विकास व्हावा आणि प्रशासकीय कामकाजाला अडथळा येऊ नये, यासाठी अतिरिक्त पद निर्मिती करून उत्तरेकडे अनेक शासकीय कार्यालये निर्माण करण्यात आली. पण राजकीय समतोल काही होताना दिसत नाही. त्यामुळे दक्षिणकडील नेते नेहमीच जिल्हा विभाजनाची मागणी करत असतात. राधाकृष्ण विखे , बाळासाहेब थोरात यांच्या सारख्या नेत्यांना मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती मिळतात. मात्र, दक्षिण नगर जिल्ह्यातील नेत्यांवर नेहमीच अन्याय होत असल्याची चर्चा खासगीत सुरू असते. यंदा देखील तीन टर्म आमदार राहिलेल्या मोनिका राजळे यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, संग्राम जगताप यांच्या देखील नावाची चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळेच की काय नेते मंडळी जिल्हा विभाजनाची मागणी करत असतात. दुसरीकडे नागरिकांनाही जिल्हा विभाजन व्हावं, असंच वाटतं. मात्र ते प्रशासकीय कामे सुरळीत व्हावे यासाठी वाटतं. केवळ राजकारण म्हणून जिल्हा विभाजनाचा मुद्दा राजकीय नेत्यांनी लावून न धरता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न देखील सोडवून दोन्ही भागांना समान न्याय देण्याचा दृष्टीने प्रयत्न करावे, अशी प्रतिक्रिया  काही नागरिकांनी दिली आहे. 

शिर्डीप्रमाणे नगर दक्षिणकडेही विमानतळ व्हावे

आता केवळ जिल्हा विभाजनाचीच मागणी होत नसून शिर्डीप्रमाणे नगर दक्षिणकडेही विमानतळ व्हावे, अशी मागणीही होऊ लागली आहे. विमानतळ झाल्यास सुपा एमआयडीसीत नवनवीन उद्योग येतील, सोबतच दक्षिण नगर जिल्ह्यातील मोहटादेवी देवस्थान, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेकच्या महागणपती देवस्थान, मेहरबाबा देवस्थानचाही विकास शिर्डीप्रमाणे होईल, असं दक्षिणेकडील नेत्यांना आणि नागरिकांना वाटतंय. म्हणून विमानतळाची मागणी केली जात  आहे. तर दक्षिण नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून जेवढ्या ताकदीने जिल्हा विभाजनाची मागणी लावून धरली जाते तेवढ्या तुलनेत उत्तरेकडील नेते ही मागणी लावून धरताना दिसत नाही. त्या उलट उत्तरेकडील नागरिक देखील प्रशासकीय कामकाज सुरळीत व्हावे, यासाठी श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी मागणी करतात. मात्र, राज्यातील राजकारणात दक्षिण नगर जिल्ह्यापेक्षा उत्तरेला कायमच झुकतं माप मिळत राहिल्याने उत्तरेकडील नेते या मागणीकडे विशेष लक्ष देताना दिसत नाही.

आणखी वाचा 

Shaktipeeth Mahamarg : मोठी बातमी : शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरातून होणार नाही, हसन मुश्रीफ यांची ग्वाही, मार्ग नेमका कुठून कुठपर्यंत?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Komal Kale Reel Star Arrested : 50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
50 हजार फॉलोअर्स असलेल्या रील स्टार कोमलला अटक, बसमधून महिलांची पर्स चोरी करायची, प्रियकरालाही बेड्या
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
पुन्हा घोळ... निवडणुकीसाठी पुण्यातून इच्छुक, पण नवऱ्याचं नाव इंदापुरात अन् बायकोचं नाव बारामतीत; सुप्रिया सुळेंनी आणलं समोर
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
निरोगी आरोग्यासाठी होलिस्टिक हीलिंगला पसंती, ही पद्धती लाखो लोकांसाठी आशेचा किरण, पतंजलीचा दावा
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
लेकाला पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाचा पूर; 8 जिल्हे, 1500 किमी धाव घेऊन पोलिसांनी शोधला ऋषिकेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget