एक्स्प्लोर

Sanjay Raut : आता '50 खोके शिंदे को ठोके', भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारं सरकार उलथवून टाकायचंय; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut : आता घोषणा बदला, 50 खोके 'शिंदे को ठोके' असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut : आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना भाजपने घेतले.  70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, 50 खोके 'शिंदे को ठोके' असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.   

संजय राऊत म्हणाले की, उध्दव साहेबांचे स्वागत प्रचंड झाले. गाडी पुढे जात नव्हती. आपण खाली उतरला मला वाटले लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन डोक्यावर घेतात की काय? हे खरं आहे जनतेने एकट्या तुम्हाला डोक्यावर घेतले, बाकी सगळे गेले. राज्यातील रामायणात आपण जिंकणार कारण आपण सर्व हुनमान आहोत. प्रत्येक शिवसैनिक हुनमान आहे. 

आमचे सरकार आल्यावरही ईडी राहील

जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्षोनुवर्षे निवडून आलेत. ते सोडून गेले, गद्दारी केली, हा शंकर आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा आहे. काल अशोक चव्हाण सोडून गेले, का गेले, आमचे सरकार आल्यावर ही ईडी राहील. अशोक चव्हाण चांगला माणूस पण तो गेला, त्याचे वडील ही मुख्यमंत्री होते. तरीही गेले पक्षाने सर्व दिले तरी गेले. आदर्श घोटाळा सर्वात मोठा घोटाळा, असा आरोप भाजपने केला. तरीही त्यांना पक्षात घेतले. 

आता घोषणा बदला '50 खोके शिंदे को ठोके'

कारगिलमधील शहीद कुटुंबियांना घर देणार. तिथे मोठी इमारत बांधली, पण एकही शहिद कुटुंबियांना घर नाही, हा आदर्श घोटाळा आहे. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, '50 खोके शिंदे को ठोके' असे म्हणताच एकच हशा पिकला. 

शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणार नाही

भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे. मोदी सांगतात ते नाही. ते गुंडांचे राज्य आहे, चोरांचे राज्य आहे. आज दिल्लीत शेतकरी जात आहेत, पण सीमेवर सैनिक उभे केले, हे सैन्य तुम्ही लढाखच्या सीमेवर उभे केले असते तर चीन आपल्या सीमेत घुसले नसते, डरपोक आहेत. 400 पार म्हणतात आणि 200 पार जाणार नाहीत. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणार नाहीत. उद्धव यांना राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करण्यासाठी खुणावत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश

व्हिडीओ

Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
पवार काका-पुतणे एकत्र आले, म्हणजे त्यांचं विलीनीकरण, शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल टाकलं; प्रकाश आंबेडकरांचं रोखठोक भाष्य
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
लोकसभेत घड्याळ हातात घेऊन पराभूत अर्चना पाटील ZP निवडणूकीत कमळ फुलवणार; धाराशिव जि. प. निवडणूका कधी लागणार?
Kuldeep Singh Sengar: उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
उन्नाव प्रकरणातील माजी आमदार कुलदीप सेंगरचा जामिन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची मोठी कोंडी; 151 जागांसाठी 300 उमेदवारांना तयारीत राहण्याचे निर्देश
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
कोल्हापुरात काँग्रेसची दुसरी यादी सुद्धा आली, महायुतीमध्ये अजूनही शिरोलीपासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयापर्यंत 'चर्चा पे चर्चा' सुरुच
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
BMC Election 2026: राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
राज ठाकरेंनी समजूत काढली, पण भांडूपमध्ये बंडखोरी झालीच, मनसेची माजी नगरसेविका अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
Embed widget