एक्स्प्लोर

मुख्यमंत्री बोले, प्रशासन हाले... मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला अन् उघड्यावर संसार आलेल्यांना 24 तासांच्या आत मिळाली पक्की घरं

Ahmednagar: वादळी वारा आणि गारपिटीमुळे घरांचं नुकसान होऊन दोन संसार उघड्यावर आली होती, मुख्यमंत्र्यांच्या आदेशांना आता त्यांना 24 तासात पक्की घर मिळाली आहेत. 

अहमदनगर: राज्यात सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.  वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने अनेक घरांची पडझड झाली. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे वादळी पावसामुळे पडझड झालेल्या घरांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. त्यावेळी उघड्यावर आलेले संसार पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आणि 24 तासाच्या आत हिरामण बर्डे आणि कचरू वाघ यांना घर मिळालंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वनकुटे येथे नुकसानीचे पाहणी केली असता त्या ठिकाणी हिरामण बर्डे यांच्या घराची पडझड झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आता 24 तासाच्या आत हिरामण बर्डे आणि कचरू वाघ यांना आता घर तयार करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे पक्या घरासाठी लागणाऱ्या विटा आणि वाळू हे देखील येऊन पडलेली आहे. त्यामुळे हिरामण बर्डे आणि कचरू वाघ यांना आता पक्के घर मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.

हातावर पोट असलेल्या आणि मिळेल ते मजुरी काम करणारे हिरामण बर्डे यांचे रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे राहते घर पडले. दोन दिवस त्यांचा संसार अक्षरशः रस्त्यावर आला होता, मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनकुटे गावाला भेट दिली आणि या कुटुंबाला तातडीने घराची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. एवढंच काय तर घर बनून झाल्यानंतर थेट मला फोन करा असंही मुख्यमंत्री म्हणाले.

थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश असल्याने प्रशासन कामाला लागले, दुपारी मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि सायंकाळी पाच वाजता घरासाठी लागणारे साहित्य येऊन पडले. मंगळवारी रात्रीचे 8 वाजेपर्यंत तर घराचे काम अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झाले होते. हिरामण बर्डे आणि कचरु वाघ यांचा शबरी योजनेतून  घरकुलासाठीही प्रस्ताव आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ आश्वासनच दिले नाही तर 24 तास त्याची पूर्तता केली त्यामुळे बर्डे कुटुंबीय आनंदी असल्याचं पाहायला मिळतंय. वनकुटे परिसरात या वादळी पावसाने 21 घरांचे नुकसान झाले आहे, त्या घरांचीही दुरुस्ती व्हावी अशी मागणी सरपंच डॉ. नितीन रांधवन यांनी केलीये. 

पारनेर तालुक्यातील पहिल्यांदाच मुख्यमंत्री आल्याने गावकरी देखील आनंदी होते, त्यातच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्याने त्यांचे वेगळेपण सर्वांनाच भावले.

 

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
Embed widget