एक्स्प्लोर

महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर भेटीगाठींचा सिलसिला वाढला....कोण कुणाला भेटतंय?

निकालाला 14 दिवस उलटले तरी महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा तिढा काही सुटायला तयार नाहीय. आणि त्यातच एकापाठोपाठ एक बैठकीचा सिलसिला मात्र सुरु आहे. जे नेते आजवर एकमेकांना भेटत नव्हते तेही अशा परिस्थितीत भेटू लागलेत आणि त्यामुळे या भेटीगाठींची एक गंमतीदार साखळीच तयार झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिवसरात्र बैठकांचा सिलसिला सुरु आहे. शरद पवार सोनिया गांधीना भेटतात. त्यानंतर दोनच दिवसात सोनिया गांधीचे उजवे हात अहमद पटेल नितीन गडकरींना भेटतात. मुख्यमंत्री सरसंघचालक मोहन भागवतांना भेटतात. तर तिकडे मुंबईत संजय राऊत पुन्हा पवारांना भेटतात. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण. या सगळ्या भेटी गेल्या काही तासांत वेगवेगळ्या शहरांत झालेल्या आहेत. पण त्या सगळ्या भेटींची साखळी नीट जोडली तर त्यात एक समान लिंक नक्कीच दिसू शकते. आज सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल हे दिल्लीत नितीन गडकरींच्या भेटीसाठी पोहोचले. दोनच दिवसांपूर्वी शरद पवार हे सोनिया गांधींना भेटले होते. त्यानंतर सोनिया गांधींचे उजवे हात गडकरींना भेटल्यामुळे भुवया उंचावल्या नसत्या तरच नवल. अहमद पटेल आणि नितीन गडकरींमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. गडकरी हे रस्ते वाहतूक मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना कुणीही भेटू शकतं हे खरं असलं तरी ज्या टायमिंगला ही भेट झाली ती महत्त्वाची. या वेळेला आपण भेटल्यावर त्याचे वेगळे अर्थ काढले जाणार याची माहिती असतानाही हे नेते भेटले. शिवसेनेच्या बार्गेनिंग पॉवरची सगळी ताकद काँग्रेसच्या भूमिकेवर आहे असं असताना या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होतं. अपेक्षेप्रमाणे अहमद पटेल यांनी मात्र या भेटीत आपण महाराष्ट्राचा 'म' ही उच्चारला नसल्याचं सांगितलं. शेतकरी, रस्त्याच्या प्रश्नावर नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती, महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती अहमद पटेल यांनी भेटीनंतर दिली. आता अहमद पटेल आणि शेतीचा काय संबंध हे देव जाणो..पण या भेटीमुळे एक झालं..2014 नंतर गडकरींनी महाराष्ट्राच्या विषयात लक्ष घालणं बंद केलं होतं. पण सध्याची सत्ताकोंडी फोडण्यासाठी आता ते महाराष्ट्राच्या या सत्ताकारणाच्या खेळात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत आले तेव्हाही त्यांनी गडकरींची भेट आवर्जून घेतली होती. दिवसभरात चर्चेत राहिलेली दुसरी भेट म्हणजे पवार-राऊत..आज पवारांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होत होती, त्याच्याच काही मिनिटे आधी संजय राऊत पवारांना भेटले. महाराष्ट्रातल्या निकालानंतरची त्यांची ही दुसरी भेट. युतीत एकत्र लढलेले शिवसेना-भाजपचे नेते अजून एकदाही चर्चेसाठी भेटलेले नाहीत, पण पवार-राऊत मात्र वारंवार भेटत आहेत, यातच सेनेचा आक्रमकपणा का वाढलाय याचं उत्तर दडलं आहे. या भेटीगाठींच्या साखळींमधली एक महत्त्वपूर्ण भेट तिकडे नागपुरातही पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला पोहोचले. शिवसेना आणि भाजपच्या युतीतला समान धागा म्हणजे हिंदुत्वाचा. त्यामुळे शिवसेनेला मनवण्यासाठी संघाची मदत घेतली जातेय का असाही प्रश्न त्यामुळे चर्चिला जाऊ लागला. निकालाला आता 14 दिवस उलटले आहेत. 9 नोव्हेंबरच्या आधी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भेटींचा सिलसिला नेमकं काय उत्तर घेऊन येणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Pune Vidhan Parishad Election 2026: आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
आर्थिक निकष पाहून विक्रम काकडेंना उमेदवारी; विलास लांडेंचा राष्ट्रवादीवर घणाघात, म्हणाले, आज 'अजितदादा असते तर...'
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare and Parth Pawar: 'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
'पार्थ पवार खूप जोरात पळतायंत असं वाटत नाही का?'; सुनील तटकरे म्हणाले...
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
अखेर काँग्रेसचंही ठरलं! नागपूरसाठी अतुल लोंढेंसह चार उमेदवारांचे नामांकन, चंद्रपूर, लातूरसह सोलापुरात कुणाच्या नावाची वर्णी? वाचा संपूर्ण यादी
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 80 लाखांचा आकडा तो ई-केवायसीचा नाही, इन्कम टॅक्स ते आरटीओच्या डेटाचा दाखला, आदिती तटकरेंनी तपशीलवार सांगितलं...
लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, आकडेवारी सांगत म्हणाल्या...
Shivsena Candidate List Vidhan Parishad Election 2026: खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी
खान, फाटक...विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर; एकनाथ शिंदेंची स्मार्ट खेळी
Commercial LPG : पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
पाच महिन्यात व्यावसायिक वापराच्या 19 किलोच्या सिलेंडरचे दर दुप्पट, 2026 मध्ये 7 वेळा दरवाढ, नवे दर जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Embed widget