एक्स्प्लोर

Travel : पृथ्वीवर राहून चंद्राला भेट द्यायचीय? तर भारतातील 'या' ठिकाणाला एकदा भेट द्या, 'मून लँड' म्हणून प्रसिद्ध

Travel : आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका ठिकाणाबद्दल सांगत आहोत. जी 'मून लँड' म्हणून प्रसिद्ध आहे. जिथे गेल्यानंतर तुम्हाला चंद्रावर गेल्याप्रमाणे भासेल

Travel : चांदोबा..चांदोबा भागलास का.. किंवा इतर चंद्रावरील गाणी आपण लहान मुलांच्या तोंडातून सहज ऐकली असतील. परंतु तुम्हाला माहित आहे का की भारतात असे एक ठिकाण आहे जे चंद्रासारखे दिसते? येथे ना झाडे आहेत, ना जास्त हवा किंवा ना दबाव आहे. यामुळेच याला चंद्रभूमी म्हटले जाते. मात्र ही चंद्राप्रमाणे भासणारी जागा नक्की आहे तरी कुठे? जाणून घ्या

 


Travel : पृथ्वीवर राहून चंद्राला भेट द्यायचीय? तर भारतातील 'या' ठिकाणाला एकदा भेट द्या, 'मून लँड' म्हणून प्रसिद्ध
छोट्या गावात 'भारताची चंद्रभूमी'

जिथे मानव आज चंद्रावर जाऊन पोहचलाय. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी शोधण्यापासून ते इतर काही गोष्टींचे रहस्य सोडवत आहे, अशात आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका ठिकाणाबद्दल सांगत आहोत. जी 'मून लँड' म्हणून प्रसिद्ध आहे. जिथे गेल्यानंतर तुम्हाला चंद्रावर गेल्याप्रमाणे भासेल, हे ठिकाण लेह-लडाखमध्ये आहे, जे साहसप्रेमींसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. तुम्ही सोशल मीडियावर पेंगॉन्ग लेक, मॅग्नेटिक हिल, लेह पॅलेस आणि चादर ट्रॅकशी संबंधित रील अनेक वेळा पाहिली असतील, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लेह आणि कारगिलमधील एका छोट्या गावात भारताची चंद्रभूमी देखील लपलेली आहे. आहे. लेहपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या लामायुरू गाव असे आहे की, तिथली भूमी चंद्राची आठवण करून देते. याच्याशी संबंधित अतिशय मनोरंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

 

हे ठिकाण मून लँड म्हणून प्रसिद्ध

लेहपासून 120 किमी अंतरावर असलेले लामायुरू गाव मून लँड म्हणून प्रसिद्ध आहे. यासंबंधित मीडिया रिपोर्टमध्ये एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, येथे ना झाडे आहेत, ना जास्त हवा किंवा ना दबाव आहे. यामुळेच याला लडाखची चंद्रभूमी म्हटले जाते.


Travel : पृथ्वीवर राहून चंद्राला भेट द्यायचीय? तर भारतातील 'या' ठिकाणाला एकदा भेट द्या, 'मून लँड' म्हणून प्रसिद्ध

या चंद्रभूमीला भूवैज्ञानिक महत्त्व

लडाखच्या या चंद्रभूमीला भूवैज्ञानिक महत्त्व आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हा कोरडा भाग नेहमीच असा नव्हता. असे मानले जाते की 35-40 हजार वर्षांपूर्वी लामायुरूमध्ये एक खूप मोठा तलाव होता, ज्याचे पाणी हळूहळू गायब झाले, परंतु तलावामध्ये जमा होणारी चिकणमाती तशीच राहिली, ज्यामुळे त्यामध्ये भेगा पडल्या. त्यामुळे या ठिकाणाची जमीन आता आपल्याला चंद्र आणि मंगळाची आठवण करून देते.


शास्त्रज्ञांसाठी एक खजिनाच जणू - लामायुरू मठ

असे म्हटले जाते की 11 व्या शतकाच्या सुमारास नारोपा ऋषींनी तलाव काढून येथे मठाची स्थापना केली. आज लामायुरू मठ हे लेह-लडाखमधील सर्वात प्रसिद्ध मठांपैकी एक आहे. हे ठिकाण म्हणजे मंगळ आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणाऱ्या संशोधक किंवा शास्त्रज्ञांसाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. मानवाला मंगळावरही पाणी सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की उपग्रहाकडून मिळालेला डेटा योग्यरित्या समजून घेण्यासाठी, पृथ्वीवरील ही ठिकाणे समजून घेणे आणि संशोधन करणे खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ असो की पर्यटक, लडाखचा हा मठ सर्वांना आकर्षित करतो आणि चंद्रावर चालण्याचा अनुभवही देतो.


Travel : पृथ्वीवर राहून चंद्राला भेट द्यायचीय? तर भारतातील 'या' ठिकाणाला एकदा भेट द्या, 'मून लँड' म्हणून प्रसिद्ध

लामायुरू मोनेस्ट्री पोहोचण्यासाठी


लेहपासून लामायुरू 120 किलोमीटर अंतरावर आहे. 
लेह आणि कारगिल या दोन्ही ठिकाणांहून सकाळी 10 ते दुपारी 12 च्या सुमारास बसेस धावतात.
ज्याद्वारे तुम्ही या मठात पोहोचू शकता. 
येथे दरवर्षी युरू कब्ग्यात नावाचा वार्षिक उत्सव देखील असतो, 
जेथे लामांनी केलेले मुखवटा नृत्य आणि निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातील अनेक पर्यटक येतात.

 

हेही वाचा>>

Hidden Gems Travel : समुद्रावरील शांततेची अनुभूती.. सोबत गणपती बाप्पाचे सानिध्य! कोकणातील 'हे' अप्रतिम ठिकाण पाहताच भान हरपेल

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget