एक्स्प्लोर

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात पितरांना अंगठ्याद्वारे पाणी का दिले जाते? महत्त्व जाणून घ्या

Pitru Paksha 2023  पितृ पक्षात पितरांना पाणी कसे अर्पण केले जाते? अंगठ्याद्वारे पाणी का दिले जाते? पद्धत जाणून घ्या

Pitru Paksha 2023 : हिंदू धर्मात (Hindu Religion) श्राद्ध पक्ष किंवा पितृ पक्षाला (Pitru Paksha 2023) विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की मृत व्यक्तीचे श्राद्ध किंवा तर्पण केले नाही तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. पितृदोषामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. पूर्वजांना समर्पित वर्षातील 15 दिवसांना पितृ पक्ष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार, पितृ पक्ष काळ पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अमावस्यापर्यंत चालतो, पितरांचे श्राद्ध केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत असून 14 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या वेळी पितरांना जल अर्पण करण्याची परंपरा आहे. पितृ पक्षात पितरांना पाणी कसे अर्पण केले जाते आणि त्याची पद्धत जाणून घेऊया.


पितरांना फक्त अंगठ्याने पाणी का दिले जाते? जाणून घ्या महत्त्व
पितृपक्षात पितरांना संतुष्ट करण्यासाठी योग्य पद्धतीने तर्पण करणे आवश्यक आहे, अन्यथा पितर प्रसन्न होत नाहीत, अशी मान्यता आहे, पितरांना फक्त अंगठ्याने पाणी का दिले जाते? त्याचे महत्त्व जाणून घ्या.


महाभारत आणि अग्निपुराणानुसार पितरांना अंगठ्याने जल अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. शास्त्रानुसार तळहाताचा अंगठा असलेल्या भागाला पितृतीर्थ म्हणतात.


तर्पण करताना अंगठ्यातून पाणी अर्पण केले जाते, तेव्हा ते पितृतीर्थातून जाते आणि पिंडांपर्यंत पोहोचते. 


असे म्हणतात की, याने पितरांचे आत्मा पूर्णपणे तृप्त होतात. त्यांना पाण्याची कमतरता नाही.


श्राद्ध करताना कुशापासून बनवलेली अंगठी, ज्याला पवित्री असेही म्हणतात, अनामिका बोटावर ती घालण्याची परंपरा आहे. त्याशिवाय तर्पण आणि पिंडदान अपूर्ण आहे.


कुशाच्या पुढच्या भागात ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात भगवान शंकर राहतात, असे मानले जाते. कुशासह जल अर्पण केल्याने, पितरांना ते सहज स्वीकारता येते, कारण ते शुद्ध आणि स्वच्छ होते.


हातात पाणी, कुश, अक्षता, फुले आणि काळे तीळ घेऊन दोन्ही हात जोडून पितरांचे ध्यान करा, त्यांना आमंत्रण द्या आणि जल ग्रहण करण्याची प्रार्थना करा. यानंतर 5-7 किंवा 11 वेळा अंजलीने पृथ्वीवर पाणी टाकावे.

 

पितृ पक्षाचा पहिला दिवस
पितृ पक्षाच्या पहिल्या दिवशी श्राद्धाची पौर्णिमा आणि प्रतिपदा तिथी येते. श्राद्धाच्या पौर्णिमेच्या दिवशी, कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला किंवा प्रतिपदा तिथीला मृत्यू झालेल्या पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण केले जाते. प्रतिपदा तिथी आज दुपारी 3:26 ते 30 सप्टेंबर रात्री 12:21 पर्यंत असेल. आज अमृत सिद्धी, सर्वार्थ सिद्धी आणि ध्रुव योग असे शुभ योगही तयार होत आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. पितृपक्षात काही विशेष कार्य केल्याने पितर प्रसन्न होतात आणि सुख-समृद्धीचे आशीर्वाद घेऊन निघून जातात.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या 

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दाढी, मिशा, नखं आणि केस कापावेत की नाही? शास्त्रानुसार काय आहेत नियम? जाणून घ्या 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Shravan 2026: श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
श्रावणात 'शिवलीलामृत' पारायण करणे विशेष का मानतात? किती दिवसात आणि कसे करावे? काय काळजी घ्यावी? कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget