एक्स्प्लोर

Relationship Tips : लग्नापूर्वी समज-गैरसमज होतील दूर, आयुष्यभर पश्चाताप होणार नाही, जोडीदारासोबत ट्रीपला जाण्याचे फायदे काय?

Relationship Tips : लग्न हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय आहे. ज्यात घाईघाईने निर्णय घेतल्यास झालेल्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. 

Relationship Tips : विवाह हा व्यक्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तुमचं आयुष्यच नाही तर तुमच्या कुटुंबाचे भावी आयुष्यही या निर्णयाशी थेट जोडलेले असते. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपण जास्त विचार न करता लगेच 'हो' किंवा 'नाही' म्हणतो, पण लग्नाचा सल्ला घेताना ही चूक अजिबात करू नका. लग्न हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय आहे. ज्यात घाईघाईने निर्णय घेतल्यास झालेल्या आयुष्याच्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. एखाद्या व्यक्तीवर तुमचे कितीही प्रेम असले तरी विवाहाच्या बंधनात अडकण्यापूर्वी एकमेकांना खोलवर जाणून घेणे गरजेचे आहे. रिलेशनशिप तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लग्नापूर्वी, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीची योजना करू शकतात, ज्यामुळे तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य समोरच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता की नाही? हे समजणे सोपे होते.

 

एकमेकांना नीट जाणून घेतल्यानंतरच लग्नाला संमती देणे चांगले.

जर तुम्हीही लवकरच लग्नाच्या बंधनात बांधले जाणार असाल, तर तुम्ही त्या व्यक्तीवर खूप प्रेम करत असलात तरीही एकाच वेळी अजिबात सहमत होऊ नका. मुलगा असो वा मुलगी, एकमेकांना नीट जाणून घेतल्यानंतरच संमती देणे चांगले. केवळ अरेंज्ड मॅरेजच नाही तर अनेकवेळा रिलेशनशिपमध्ये असूनही जोडीदार संपूर्ण आयुष्य एकत्र घालवू शकतो की नाही हे कधी कधी समजत नाही. रिलेशनशिप तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, एकमेकांची मतं जाणून घेण्यासाठी, तसेच स्पष्टतेसाठी, जोडप्यांनी एकत्र सहलीला जावे आणि संकोच न करता, त्यांच्या भावी जोडीदाराशी काही समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. यामुळे तुम्हाला हे समजणे सोपे जाईल की, तुम्ही ज्या व्यक्तीशी आयुष्यभर संबंध ठेवणार आहात का? ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही? या परिस्थितीत, एक ट्रीप तुम्हा दोघांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते. या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या..

परस्पर समज

प्रवास करताना, तुम्हा दोघांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. विशेषत: ज्या समाजात अविवाहित जोडप्यांबाबत वेगवेगळ्या समजुती आहेत. अशा परिस्थितीत, हा अनुभव तुम्हाला आणि तुमचा जोडीदार प्रतिकूल परिस्थिती आणि ताण कसा हाताळू शकतो हे जाणून घेण्याची संधी देईल.

 

संवाद

सहलीचे नियोजन करणे आणि त्याची योग्य अंमलबजावणी करणे हे स्वतःच एक अडचणीचं काम आहे. दरम्यान, नात्यात अनेक गोष्टींवर निर्णय घ्यावे लागतात, गोष्टी समजून घ्याव्या लागतात, येणाऱ्या अडचणींनुसार नियोजन आणि दूरदृष्टी ठेवावी लागते. तुम्ही एकमेकांशी कोणत्या स्तरावर संवाद साधू शकता हे जाणून घेण्यासाठी ही सहल तुमच्यासाठी खास संधी असेल. त्याचबरोबर तुम्ही एकमेकांसोबत योग्य निर्णय घेऊ शकता की नाही… हेही स्पष्ट होईल.


एकमेकांची आवड-निवड


प्रवास करताना, तुम्हाला विविध प्रकारचे लोक, संस्कृती इत्यादी समजून घेण्याची संधी मिळते. अशात जोडीदारासोबत सहवास अनुभवल्याने एकमेकांच्या आवडीनिवडी, नापसंती, मतभेद आणि आवडीनिवडी समजून घेण्याची संधी मिळते.

 

भावनिक संबंध

असे दिसून येते की, सहलीनंतर, काही जोडपे सहजपणे कायमचे एकत्र राहण्याचा निर्णय घेतात, तर काहीजण एकमेकांपासून वेगळे होणे चांगले मानतात. दोन्ही परिस्थितींत तुमच्या दोघांचे फायदे आहेत. येथे कोणतेही योग्य किंवा चुकीचे नाही, इतकेच आहे की, प्रत्येक व्यक्ती प्रत्येकासाठी बनलेली नाही. दोन जोडपी भावनिकदृष्ट्या किती जोडलेली आहे, हे शोधण्यासाठी एकत्र सहलीला जाण्यापेक्षा चांगली कल्पना असू शकत नाही.


भविष्याबद्दल एकमेकांचे विचार

जर तुम्हाला आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याची कल्पना असेल, तर एकत्र सहलीला जाणे तुमच्या नात्याचे भविष्य घडवण्याची एक चांगली संधी ठरू शकते. येथे तुम्ही कोणत्याही गोष्टीट विचलित न होता तुमच्या भविष्याची एकत्रित योजना करू शकता, तुमच्या अपेक्षा शेअर करू शकता.

 

हेही वाचा>>>

Relationship : फक्त तुम्हीच नाही! ब्रेकअपनंतर अनेकांच्या शरीरात होतात 'असे' बदल, जाणून आश्चर्यचकित व्हाल

 

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Shrikant Shinde :  लेकाला डिवचलं;  पिता खवळला; श्रीकांत शिंदेंवर घणाघातJob Majha : भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी : 6 October 2024 : abp MajhaABP Majha Headlines :  7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget