एक्स्प्लोर

Health Tips : अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर 'या' पाच गोष्टी खाण्याची चूक करु नका, अन्यथा...

Foods Not To Eat After Sprouted Chana : अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाणं टाळावं. अंकुरलेल्या हरभऱ्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन असतात, ते पचनास मदत करतात. त्यामुळे यासोबत काही पदार्थ खाल्ल्यास पचनशक्ती बिघडू शकते.

मुंबई : अंकुर आलेली कडधान्ये खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. अंकुरलेले चणे (Sprouted Chana) म्हणजे हरभरे आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरतात. अंकुर आल्याने हरभऱ्यातील पोषकतत्वे आणि जीवनसत्त्वे यांचं प्रमाण वाढतं. अंकुरलेले चणे खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि अनेक समस्यांपासूनही सुटका मिळते. कोंब आलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील मुबलक प्रमाणात आढळते, यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर 'या' पाच गोष्टी खाऊ नका

काही जणांना नाश्त्याच्या वेळी अंकुरीत चणे खायला आवडतं. पण अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाणं टाळणं गरजेचं आहे, नाहीतर त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अंकुरलेले हरभरे खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाल्ल्याने पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात यामुळे पोटासंबंधित समम्या होऊ शकतात. याबाबत सविस्तर माहित जाणून घ्या.

1. दूध पिऊ नका

अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तास दूध पिऊ नये. यामुळे नैसर्गिक पौष्टिक घटकांसह संतुलितपणे आहार पचायला वेळ मिळेल. अंकुरलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी आणि दुधामध्ये असलेले कॅल्शियमचे शरीरात ऑक्सलेट तयार होतात. ऑक्सलेटमुळे त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते. 

2. अंडी खाऊ नका

स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन के आणि प्रथिने असतात, तर अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असतात. अंड्यातील प्रथिनांच्या प्रमाणामुळे चणे पचन होण्यास वेळ लागू शकतो. याच्या मिश्रणाने पोटात गॅस, पेटके आणि अपचणाची समस्या उद्भवू शकते. 

3. लसूण देखील खाऊ नका

लसूण खाल्ल्याने त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. त्याचे सेवन हानिकारक ठरू शकतं. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, मुरुम आणि लाल चट्टे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

4. लोणचं खाऊ नका

अंकुरलेल्या चण्यामध्ये प्रथिने आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असतं. तर, लोणच्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर जास्त प्रमाणात असते. हे एकत्र सेवन केल्याने पोटात जळजळ, अॅसिडीटी आणि अपचन होऊ शकते. लोणच्याची आंबट आणि खारट चव अंकुरलेल्या हरभऱ्याच्या पचनास अडथळा ठरू शकतो. त्यामुळे अंकुरलेले चणे खाल्ल्यानंतर किमान एक ते दोन तासांनंतरच लोणचं खावं.

5. कारलं खाऊ नका

अंकुरलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन के असते आणि कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते. दोन्ही जीवनसत्त्वांचे मिश्रण शरीरात ऑक्सलेट तयार करू शकते जे हानिकारक आहे. त्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव पडतो आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Paper Straw : कागदी स्ट्रॉचा वापर आरोग्यासाठी घातक! हानिकारक रसायनांचा शरीरावर वाईट परिणाम; संशोधनात धक्कादायक माहिती समोर

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget