Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar : बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला त्यांचा गड देखील राखता आला नाहीये. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची हि पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर : राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालाअंती बहुतांश ठिकाणी भाजपचंच कमळ फुलल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation Election Result 2026) भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावलीय. तब्बल 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार, हे आता जवळ जवळ स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे, बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेनेला त्यांचा गड देखील राखता आला नाहीये. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत (Chhatrapati Sambhajinagar Muncipal Corporation Election Result) ठाकरे गटाने 94 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला दोन आकडी विजयही मिळवता आलेला नाही. ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेना नेते अंबादास दानवे यांनाही भावाच्या पराभवामुळे फटका बसल्याचा दिसून आलंय. या सर्व पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट करत भाष्य केलंय. अंबादास दानवे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा एक फोटो आणि व्हिडीओ शेयर केलाय. यावर आपलेच फितूर निघाले तरी शेवटच्या श्वासापर्यंत लढू असं लिहलं आहे. ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची हि पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
Ambadas Danve on BJP : पैशाची वृष्टी भाजपच्या आकाशातून झाली. धो-धो पैशाचा पाऊस झाला
एकीकडे बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा गड राखता आला नाही. दुसरीकडे शिंदे गटाला ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जागाच मिळाल्या असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचा चित्र आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले कि, पराभव मान्य केला पाहिजे. 35 ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकावर राहिलो आहे. आमचे 7 ठिकाणी विजय झाले. आम्ही प्रचार चांगला केला होता, मात्र पैशाची वृष्टी भाजपच्या आकाशातून झाली. धो-धो पैशाचा पाऊस झाला. 14 तारखेला 25 टक्के मतदान झाल्याची घटना घडली, अशी तक्रार आहे. मतदान रीसेट झाले अशीही तक्रार झाली आहे. या शहराला भाजपने पाणी दिले नाही, तरी जनतेने भाजपला निवडून दिले आहे. जनतेच्या मनात काही असेल तर शुभेच्छा, असेही अंबादास दानवे म्हणाले.
Ambadas Danve : हरलो हे आमचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दुर्दैव
मात्र, सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही, हे सत्य आहे. हरलो हे आमचे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दुर्दैव आहे. यांच्याकडे सर्व उपलब्ध असताना ते 11,12 पर्यंत पोहोचविले. आम्हला संपविले मात्र त्यांचे जे कलीग आहे. त्यांना तरी संपवायला नको होतं. येणाऱ्या काळात निवडून आलेले 70 लोक मुंबईला दिशा देतील. आमचे सगळे गेले तरी आम्ही 70 जगा जिंकल्या. हे काही कमी नाही. असेही ते म्हणाले.




















