एक्स्प्लोर

तुम्हीही घाईघाईत जेवून आजारांना आमंत्रण देताय का? नुकसान जाणून घ्या

Food Eating Habit : जेवताना अन्न हळूहळू खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो.

Food Eating Habit : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वत:कडे लक्ष देणं विसरत चाललो आहोत. आपल्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या कोणत्या वाईट याचा सुद्धा आपण विचार करत नाही. त्यामुळे बाहेरचं जंक फूड खाणं, आरोग्याकडे दुर्लक्ष करणं यांसारखे प्रकार अगदी सहज घडतात. आपल्याजवळ इतका वेळ नसतो की जेवतानाही आपण घाईघाईने जेवतो. आयुर्वेदात हळूहळू आणि चघळल्यानंतर खाण्याचा सल्ला दिला आहे. विज्ञानाचा देखील या गोष्टीवर विश्वास आहे. विज्ञानानुसार अन्न लवकर खाल्ल्याने अन्नाबरोबर हवाही शरीरात पोहोचते. त्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या सुरू होते. जर तुम्हीही फास्ट अन्न खात असाल तर तुम्हाला फास्ट खाण्याचे दुष्परिणाम देखील जाणून घेणं गरजेचं आहे.

लवकर वजन वाढणे

विज्ञानानुसार, जेव्हा आपण अन्न जेवतो तेव्हा मेंदू 20 मिनिटांनंतर पोट भरल्याचा सिग्नल पाठवतो. जेव्हा अन्न पटकन खाल्ले जाते, तेव्हा मेंदू हा सिग्नल उशिराने देतो. ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जाते. त्यामुळे वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.
 
मधुमेहाचा धोका

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, लवकर अन्न खाणाऱ्यांना हळू खाणाऱ्यांच्या तुलनेत अडीच पट जास्त मधुमेह होण्याची शक्यता असते. यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी खालावते, ज्यामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
 
इन्सुलिन प्रतिकार

फास्ट खाणाऱ्यांच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची पातळी बिघडते. त्यामुळे चयापचय समस्या वाढू लागतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही असतो.
 
पचन समस्या

अन्न खूप वेळा खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण लवकर खातो तेव्हा आपण अन्नाचे मोठे तुकडे उचलतो. ते पचवण्यासाठी पचनसंस्थेला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अपचनाची तक्रार होऊ शकते आणि अन्नही उशिराने पचते.
 
मन तृप्त होत नाही 

जेव्हा तुम्ही पटकन अन्न जेवता तेव्हा तुमचे पोट अन्नाने भरले तरी तुमचे मन तृप्त होत नाही. यामुळे, आपण अन्नाने तृप्त होऊ शकत नाही. यामुळेच काही लोक अनेकवेळा पोट भरूनही अन्न खातात. त्याचा परिणाम वजनावर दिसू लागतो आणि लठ्ठपणा वाढू लागतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Aadhar Card link : लाडकी बहीण आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसं करायचं? New UpdateTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा: 23 August 2024HC on Mumbai Band : कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही- हायकोर्टाचे निर्देश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil on Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे; जयंत पाटलांची खोचक टीका
'एकनाथ शिंदेंनी दिल्लीचा कब्जा केल्याने इतर दोघांचे फारसे चालत नाही, परिस्थिती हळूहळू बदलत आहे'
CM Eknath Shinde : काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
काहींना दु:खातही राजकीय संधी दिसते, अशाना कोर्टाची चपराक;  महाराष्ट्र बंदच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Balbhim Rakhunde : आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचं लिहिलं
Karnataka High Court : घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
घटस्फोटानंतरही बायकोची नवऱ्याकडून महिन्याला सहा लाख रुपये मेंटेन्सन्सची मागणी; महिला न्यायमूर्तींनीच घेतला 'क्लास'
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
Embed widget