एक्स्प्लोर

Health Tips : उच्च रक्तातील साखर ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा; 'या' 5 सवयींनी नियंत्रित करा

Blood Sugar : मधुमेह ही एक मोठी समस्या आहे. हे लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Blood Sugar : रक्तातील साखरेची पातळी वाढणे हे खरंतर आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने प्री-डायबेटीक (Pre-Diabetic) किंवा मधुमेह (Diabetes) यांसारखी लक्षणं शरीरात दिसू लागतात. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी ही रक्तातील साखरेची पातळी सतत नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं आहे. पण, तुमच्या जीवनशैलीतील काही सवयी यामध्ये अडथळा ठरू शकतात. या कारणास्तव, या सवयी बदलणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण कसे टाळता येईल ते जाणून घेऊयात.

ब्लड शुगर म्हणजे काय?

आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा आपल्याला कार्बोहायड्रेट्सपासून मिळते. कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लुकोज असते. रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. या कारणामुळे आपल्याला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रक्तातील साखरेची सामान्य रेंज 70mg/dL ते 100mg/dL उपवासा दरम्यान आणि जेवणानंतर 2 तासांनी 140mg/dL पेक्षा कमी असावी. रक्तातील साखरेची पातळी वाढण्याच्या समस्येला हायपरग्लायसेमिया म्हणतात. 

रक्तातील साखरेची पातळी वाढण्यापासून कसे थांबवता येईल?

व्यायाम करा

रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे शारीरिक हालचाल न करणे. व्यायाम करताना, तुमचे शरीर ग्लुकोज वापरते, जे रक्तातील साखरेची पातळी राखते. याशिवाय व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त फॅटही कमी होते, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही व्यायाम फायदेशीर आहे. त्यामुळे रोज काही वेळ योगा करा.

आहाराची काळजी घ्या

आहाराचा थेट परिणाम आपल्या रक्तातील साखरेवर होतो. अधिक प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखर आणि मीठ असलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. त्यामुळे हिरव्या भाज्या, फळे, दही, संपूर्ण धान्य इत्यादींचा आहारात समावेश करा. तसेच, तुमच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण नियंत्रित ठेवा. 

फायबरचे सेवन वाढवा

अन्नातील फायबरचे प्रमाण वाढवून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. फायबर हळूहळू पचते, ज्यामुळे रक्तातील साखरेची वाढ होत नाही. याशिवाय फायबर पचनासाठीही फायदेशीर आहे. याशिवाय, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.

तणाव कमी करा

दैनंदिन जीवनातील वाढत चाललेला ताण यामुळे आपण तणावाला बळी होऊ शकतो. तणावामुळे आपले शरीर कॉर्टिसॉल सोडते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्यामुळे तणाव कमी करा. 

पुरेशी झोप घ्या

झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते आणि स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉल देखील बाहेर पडतो. म्हणून, दररोज 7-8 तास पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं

महत्त्वाच्या बातम्या

How To Get Rid Of Lizards : भिंतीवर पाल दिसताच अंगावर काटा येतो? मारण्याऐवजी घरातून पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय!
भिंतीवर पाल दिसताच अंगावर काटा येतो? मारण्याऐवजी घरातून पळवून लावण्याचे सोपे घरगुती उपाय!
Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
Child Health: पालकांनो लक्ष द्या! भारतात लहान वयातच मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढलं! येत्या काही वर्षांत आणखी वाढ? डॉक्टरांचा इशारा...
पालकांनो लक्ष द्या! भारतात लहान वयातच मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढलं! येत्या काही वर्षांत आणखी वाढ? डॉक्टरांचा इशारा...
Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...
शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget