एक्स्प्लोर

MPSC : कृषी सेवेच्या 258 पदांबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अखेर निर्णय घेतला, प्रसिद्धीपत्रक जारी, जाणून घ्या..

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कृषी सेवेच्या 258 पदांबाबत भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळं 25 ऑगस्टला होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत 258 पदांचा समावेश नसेल.

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या 25 ऑगस्टला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील 258 पदांचा समावेश केला जावा यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. विविध राजकीय नेत्यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला होता. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील याबाबत भूमिका मांडली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या सर्व प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. महाराष्ट्र कृषी सेवेतील गट- अ, गट-ब, गट-ब कनिष्ठ या संवर्गातील 258 पदांचा समावेशी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत करणं शक्य होणार नसल्याचं म्हटलं आहे 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काय भूमिका मांडली? 

महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील एकूण 258 पदांचे मागणीपत्र आयोगास दिनांक 16 ऑगस्ट, 2024 रोजी शासनाकडून प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केलेले आहे. तथापि, सदर परीक्षेसंदर्भात दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2024 साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त
झाले नसल्याने, सदर कृषी सेवेतील पदांचा समावेश जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही, अशी भूमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मांडली आहे.


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी घेण्यात येत असून सद्यस्थितीत प्रस्तुत परीक्षेशी संबंधित सर्व पूर्व तयारी झालेली आहे. प्रस्तुत परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरतीप्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं म्हटलं आहे. 

विद्यार्थ्यांची मागणी अयशस्वी 

कृषी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये  258 पदांची वाढ करावी, अशी मागणी केली होती. राजकीय नेत्यांनी या प्रकरणात आपली बाजू मांडली होती. महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ, गट-ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) अशी एकूण 258 पदे सरळसेवा भरतीने भरण्यासाठी कृषी विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्राद्वारे कळवण्यात आले आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली होती. मात्र, कृषी विभागाकडून मागणीपत्र 16 ऑगस्ट रोजी देण्यात आलं.त्यामुळं आयोगानं पर त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं ट्विट

संबंधित बातम्या :

BMC Recruitment 2024 : गुड न्यूज, मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज कधी करायचा? जाणून घ्या सविस्तर

Police Bharti : तरुण-तरुणींसाठी खुशखबर, राज्यात डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती; मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदं

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget