एक्स्प्लोर

'चला हवा येऊ द्या'तील 'त्या' पात्रामुळे आगरी बांधव दुखावले

'चला हवा येऊ द्या'तील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला आहे.

मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी मालिकेला पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे. कार्यक्रमातील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला आहे. आगरी-कोळी समाजाची कार्यक्रमातून जाहीर माफी मागण्यासही या संघटनेने फर्मावलं आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या 5 आणि 6 नोव्हेंबर 2018 च्या कार्यक्रमातील 'दिवाळी पहाट'मध्ये विविध कवी, गायक अशी पात्रं दाखवली होती. त्यात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ 'अधोक्षज' भोईरचे विनोदी पात्र दाखवले होते. मात्र आगरी समाजात हे नाव अत्यंत अभावाने आढळत असल्याचं पत्रात अॅड. भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी म्हटलं आहे. आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे गैर नाही. त्यासाठी आगरी बोलीभाषिक वैशिष्ट्याचा वापर करणेही चूक नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने बजावलं. पत्रात काय? आगरी माणूस हा भरभरुन दागिने घालतो, ती आमची परंपराच आहे, संस्कृती आहे. कोणी एक नाही तर सर्व समाजच भरभरुन दागदागिने घालतो! ते समाजाचेच वैशिष्ट्य असताना, त्यावर अशी टिप्पणी कशी केली जाऊ शकते ??? बरं, आगरी माणसाने स्व-कष्टाने रात्रन्-दिवस खपून आपल्या मीठ-शेती-रेतीतून हे मिळवले आहेत. त्याने कधी कोणाला लुटलेले नाही लुबाडलेले नाही. डाका घालायला तो काही दरोडेखोर नाही. सासऱ्याला लुबाडून-नडून, ते हुंड्यातूनसुद्धा मिळवलेले नाही. आगरी समाज कष्ट संघर्ष, मेहनत काही करीत नाही ? सतत दारुत टाईटच असतो ? जुगार खेळून त्याच्या हाती पैसा येतो ? म्हणजे हाच त्याचा कमवण्याचा उद्योग आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. येत्या आठवडाभरात जर आपण माझ्या समाजाचे असे विकृतीकरण करुन केलेल्या सादरीकरणामुळे दुखावल्या गेलेल्या भावनांमुळे जाहीर माफी मागावी, अन्यथा आपल्या संपूर्ण टीमला माझ्या समाजाच्या भडकलेल्या भावनांना सामोरे जावे लागेल आणि त्यामुळे जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपली असेल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2 Box Office Collection Day 1: महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल, रिलीजच्याच दिवशी कमाई किती?
महाराष्ट्रात दुमदुमला 'श्री स्वामी समर्थ' नामाचा गजर; 'देऊळ बंद 2' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल
Anshuman Vichare Buys New Car: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याकडे आणखी एक गूड न्यूज; आधी मुंबईत तिसरं घर घेतलं अन् आता... VIDEO
Jai Jai Swami Samrth Marathi Serial Track: गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद, परीक्षा सुरू; स्वामी सुरक्षित मार्ग दाखवणार?
गंगाच्या स्वप्नांमागचं गूढ दिवसेंदिवस अधिक गडद, परीक्षा सुरू; स्वामी सुरक्षित मार्ग दाखवणार?
Gullak Season 5 Trailer: भिंतींना पडलेल्या भेगा की नात्यांमधील दुरावा? 'गुल्लक 5'मध्ये मिश्रा कुटुंबाची नवी कसोटी
भिंतींना पडलेल्या भेगा की नात्यांमधील दुरावा? 'गुल्लक 5'मध्ये मिश्रा कुटुंबाची नवी कसोटी

व्हिडीओ

Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Fuel Shortage Special Report : डिझेलसाठी रात्रभर रांगा, एक कॅन डिझेलसाठी कुठे राडा कुठे दंगा
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
महायुतीत विधानपरिषदेसाठी 1 जागेवरुन घोडं अडलं; भाजप प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदेंना भेटले, तोडगा नाहीच
Alandi Temple : आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली, विशाल वारुळे कसा अडकला?
आळंदीत माऊलींच्या दानपेटीवर डल्ला, विश्वासू सेवेकऱ्याच्या घरी पावणे चार लाखांची रोकड सापडली
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात 90 जणांच्या चिंधड्या, अजून किती अडकले याची मोजदाद नाही; चीनमध्ये दशकातील सर्वाधिक भीषण दुर्घटना
Cockroach Janata Party: कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
कॉक्रोच जनता पार्टीने 'क्रांती'ची मशाल पेटवली, देशभरात जोरदार हवा, साताऱ्यात युवा पँथरचं आंदोलन
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
मोठी बातमी! आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले...
Embed widget