एक्स्प्लोर

Shreya Bugde On Chala Hawa Yeu Dya Team: 'चला हवा येऊ द्या'च्या टीममध्ये धुसफूस? अखेर श्रेया बुगडेनं मौन सोडलं, कोणतेही आढेवेढे न घेता थेट म्हणाली...

Shreya Bugde On Chala Hawa Yeu Dya Team: 'चला हवा येऊ द्या'च्या टीममध्ये धुसफूस असल्याचंही बोललं गेलं. पण नेमकं झालेलं काय? याचं उत्तर आता त्याच टीममधली स्टार अभिनेत्री श्रेया बुगडे हिनं दिलंय.

Shreya Bugde On Chala Hawa Yeu Dya Team: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). अख्ख्या महाराष्ट्रानं या कार्यक्रमावर भरभरुन प्रेम केलं. तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला. त्यानंतर या मराठमोळ्या कार्यक्रमाचं (Marathi Show) दुसरं पर्व, 26 जुलैपासून झी मराठीवर (Zee Marathi) सुरू झालं पण, नव्या बदलांसह. पण, या नव्या पर्वात ज्या 'चला हवा येऊ द्या'च्या (Chala Hawa Yeu Dya Marathi Show) टीमवर महाराष्ट्रानं भरभरुन प्रेम केलं, ती संपूर्ण टीम दिसली नाही. अनेक चर्चांना उधाण आलं. तर, कित्येक तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. 

महत्त्वाची बाब म्हणजे, निलेश साबळे (Nilesh Sable) आणि भाऊ कदम (Bhau Kadam) ही प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तीमत्त्व नव्या पर्वात दिसली नाहीत. नव्या पर्वाची घोषणा होताच, हे दोघे का नाहीत? यावरुन बराच गदारोळ झाला. त्यावेळी आम्ही वेगळ्या कामांमध्ये बिझी आहोत, असं उत्तर दोघांकडूनही देण्यात आलं. पण, तरी महाराष्ट्राच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत राहिली. 'चला हवा येऊ द्या'च्या टीममध्ये धुसफूस असल्याचंही बोललं गेलं. पण नेमकं झालेलं काय? याचं उत्तर आता त्याच टीममधली स्टार अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) हिनं दिलंय. श्रेयानं एका मुलाखतीत बोलताना त्यावेळी नेमकं काय घडलेलं हे सांगितलंय. 

अभिनेत्री श्रेया बुगडे नेमकं काय म्हणाली? (Shreya Bugde On Chala Hawa Yeu Dya)

'मित्र म्हणे'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रेया बुगडे म्हणाली, "चला हवा येऊ द्या' जेव्हा पहिल्या सीझन थांबलं तेव्हाच असं ठरलं होतं की, जेव्हा ते कधीही परत येईल तेव्हा ते सीझन बेस्डच असेल. ते कधीच पुन्हा 10 वर्षांसाठी होणार नव्हतं. कारण आता ट्रेण्ड्स बदलले आहेत. लोकांना नवीन नवीन बघायचंय. वाहिनी म्हणून ते वेगळ्या पद्धतीने याकडे बघतायेत. त्यांच्या पण काही गोष्टी आहेत ज्या त्यांना फॉलो करायच्या आहेत. प्रचंड स्पर्धा आहे. आता तर ओटीटी पण आहे. टेलिव्हिजनचीही गणितं बदलली आहेत. त्यामुळे दुसरा सीझन लवकर संपला, असं नाही तर हा सीझन एवढाच असणार होता. मर्यादित भागांचाच असणार होता. सोबतच डॉ. निलेश साबळेंचं सिनेमाचं काम सुरू होतं. भाऊ एका वेगळ्या सिनेमासाठी शूट करत होता. त्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे जी टीम एकत्र आली ती ही होती..."

"आमचं बाँण्डिंग अजूनही तसंच आहे. अजूनही आम्ही महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम करतो, तेव्हा सगळे एकत्रच असतो. नुकतंच मी आणि भाऊ एका कार्यक्रमात होतो. कुशल, मी, भाऊ, भारत दादा आम्ही भेटत राहतो... माझी तर इच्छा आहे की, आमची टीम पुन्हा वेगळ्या स्वरुपात, कार्यक्रमात परत यावी. डॉक्टर तर इतके टॅलेंटेड आहेत त्यांच्याकडे एवढ्या भन्नाट संकल्पना असतात त्यामुळे वाहिनीची साथ मिळाली आणि आम्ही तर आहोतच तर हे नक्की घडू शकेल...", असं श्रेया बुगडे म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranbir Kapoor Visit Marathi Actress Smita Jaykar House: बॉलिवूडचा बडा दिग्दर्शक अन् अभिनेता अचानक मराठी अभिनेत्रीच्या घरी पोहोचले, जमिनीवर मांडी घालून जेवायला बसले, कोळंबीचा रस्सा...

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Embed widget