"सरकारविरोधी बोललात तर मृत्यूची भीती" ; ‘मस्ती 4’ अभिनेत्री इराणबाबत थेटच बोलली, म्हणाली, 'भारतात किमान..'
तिचं कुटुंब अजूनही इराणमध्ये राहत असल्यामुळे हा विषय तिच्यासाठी अत्यंत वैयक्तिक असल्याचं तिने सांगितलं.

Bollywood Actress: ‘मस्ती 4’ आणि ‘जुग जुग जियो’ या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री एलनाझ नोरोझी (Elnaz Norouzi) त्यांना अनेक सामाजिक आणि कायदेशीर निर्बंधांना सामोरं जावं लागतं, असं तिने सांगितलं. तसेच भारतासारख्या देशात महिलांना मिळणाऱ्या स्वातंत्र्याचं महत्त्व ओळखायला हवं, असंही ती म्हणालीय. (Irani Actress) एक दिवस इराण स्वतंत्र झाल्यावर ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तिथे जाईल. मात्र त्यानंतर ती पुन्हा भारतात परत येईल. “भारत माझं दुसरं घर आहे. इथे मी सुरक्षित आणि आनंदी वाटतं,” असंही ती म्हणाली.
“भारतामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे”
एलनाजने सांगितलं की अनेक देशांमध्ये आजही महिलांना आपलं मत मांडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. “भारतासारख्या देशात आपण राहतो, जिथे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आणि महिलांना आपले विचार व्यक्त करण्याची मोकळीक आहे. त्यामुळे ही संधी निडरपणे वापरून सकारात्मक बदल घडवून आणायला हवेत,” असं तिने म्हटलं. एलनाजने अनेकदा इराणमधील परिस्थितीवर उघडपणे भाष्य केलं आहे. त्यामुळे तिला टीकाही सहन करावी लागते. तिचं कुटुंब अजूनही इराणमध्ये राहत असल्यामुळे हा विषय तिच्यासाठी अत्यंत वैयक्तिक असल्याचं तिने सांगितलं.
“इराणमध्ये आवाज उठवलात तर सरकार मारू शकतं”
तिने सांगितलं की इराणमध्ये सरकारविरोधात बोलण्याची मोकळीक नाही. “मी फक्त ७.५ कोटी इराणी लोकांच्या भावना व्यक्त करत नाही, तर त्याहूनही अधिक लोकांच्या भावना मांडत आहे. ज्यांचा आवाज दाबला गेला आहे, त्यांचा आवाज बनण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण इराणमध्ये लोकांना आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही. सरकारविरोधात बोलण्याची परवानगी नाही. तसं केल्यास जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच मी आणि देशाबाहेर राहणारे अनेक इराणी अशा लोकांसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यांचा आवाज कोणी ऐकत नाही.” असा आरोप तिने केला.
“भारतामध्ये महिलांना कपड्यांची मोकळीक”
एलनाज म्हणाली, “भारत किंवा पाश्चिमात्य देशांप्रमाणे इराणमध्येही महिलांना स्वातंत्र्य मिळावं अशी माझी इच्छा आहे. भारतात एखादी महिला बुरखा घालू शकते आणि इच्छा असेल तर शॉर्ट्सही घालू शकते. महिलांना स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा. तिने बालविवाह बंद व्हावेत, महिलांना फुटबॉल स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहण्याची परवानगी मिळावी, महिलांना न्यायाधीश बनण्याची संधी मिळावी आणि वारसाहक्कात पुरुषांइतकेच अधिकार मिळावेत, अशीही मागणी तिने केली.
“स्वतंत्र इराणमध्ये परत जाईन”
एलनाजने सांगितलं की एक दिवस इराण स्वतंत्र झाल्यावर ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तिथे जाईल. मात्र त्यानंतर ती पुन्हा भारतात परत येईल. “भारत माझं दुसरं घर आहे. इथे मी सुरक्षित आणि आनंदी वाटतं,” असंही ती म्हणाली.
हेही वाचा





















