मुंबई : हाथरस घटनेनं संपूर्ण देश हादरला. त्यानंतर त्याबद्दल अनेक उलट सुटल चर्चा झडल्या. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी या घटनेचा निषेध केला. तर काही राजकीय नेत्यांनी या घटनेचं खापर मृत मुलीवर फोडलं. ती मुलगी आपल्यावर बलात्कार झाल्याचं सांगत असताना, तिच्या शवविच्छेदन अहवालात मात्र त्याचा उल्लेखही नव्हता. यावरही अनेक स्तरातून टीका झाली. आता या वादात मल्लिका शेरावतही पडली आहे.



हाथरस घटनेचा निषेध नोंदवतानाच, भारतीयांना तिने मानसिकता बदलण्याचा सल्ला दिला आहे. आपल्याला अशा घटना थांबवायच्या असतील तर महिलांकडे पाहण्याचा पुरुषी दृष्टिकोन बदलण्याची गरज तिने बोलून दाखवली होती. त्यावर अनेकांनी तिला तिच्या चित्रपटांची आठवण करून दिली. यातल्या काहींनी मल्लिकाच्या चित्रपटांमुळेच भारतात बलात्कार होत असल्याचा जावईशोधही लावला आहे. एरवी कमेंट्स ना फारसं प्रत्युत्तर न देणारी मल्लिका मात्र या कमेंटने उखडली आहे.  त्यावर ती म्हणते, 'लोकांच्या कमेंट्सपुढे हसावं की रडावं तेच कळत नाही. माझ्या सिनेमांमुळे जर बलात्काराच्या घटना वाढतायत असं काहीचं म्हणणं असेल तर त्यांनी माझे सिनेमेच पाहू नयेत.'




तिची ही कमेटं वाऱ्यासारखी व्हायरलं होते आहे. मल्लिकाने केलेल्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने प्यार के साईड इफेक्ट्स, मर्डर, ख्वाईश आदी चित्रपटांचा समावेश होतो. तिने केलेल्या अंगप्रदर्शनामुळेच भारतीय पुरुषांच्या मनात वासना निर्माण होते असं काहींनी म्हटलं आहे. हाथरस घटनेनंतर महिलांच्या वर्तणुकीवरही अनेक राजकीय नेत्यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. त्यावरूनही सध्या अनेक वाद झडताना दिसतायत.




महत्त्वाच्या बातम्या :