Actor Death: मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन, अभिनेत्रीकडून इमोशनल पोस्ट शेअर
TV Star Siddharth Venugopal Dies: प्रसिद्ध मल्याळम अभिनेता सिद्धार्थ यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे.

Malayalam TV actor Siddharth Venugopal Death: मल्याळम टीव्ही इ़ंडस्ट्रीतून (TV Industry) एक दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल (Siddharth) यांचं निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती. ते गंभीर आजाराशी झुंज देत होते. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री सीमा. जी नायर यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. भावनिक पोस्ट शेअर करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, सिद्धार्थ जवळपास दोन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. सीमा सिद्धार्थ यांच्या तब्येतीची काळजी घेत होते. दोघांनी आपल्या कारकिर्दीत 'कस्तूरीमन' आणि 'भाग्यजातकम्' यांसारख्या टीव्ही सिरियलमध्ये काम केलं होतं. ही दु:खद बातमी समोर येताच, त्याच्या चाहत्यांसह इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला.
अभिनेत्री सीमा यांनी इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 'सर्व आशा आता मावळल्या आहेत. लोकप्रिय मालिका अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल आता हयात नाहीत. या जगातून त्यांनी निरोप घेतला, जिथे वेदना नाही. गेल्या दोन वर्षांपासून मी तुमच्यासाठी लढत राहिले. माझे मन आणि शरीर पूर्णपणे थकून गेले असतानाही, तुमचा जीव वाचवण्यासाठी मी धावपळ करत राहिले. आज देवाने ठरवले आहे की, तुला आता आणखी त्रास होऊ नये...सिद्धार्थ मी हे सहन करु शकत नाही, मी पूर्णपणे खचले आहे..', असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर (Malayalam TV actor Sidharth Venugopal has passed away)
अॅक्टर किशोर सत्याने सिद्धार्थ यांना श्रध्दांजली वाहिली आहे. 'आम्ही आणखी एका कलाकाराला खूप लवकर गमावले आहे. सिद्धार्थ वेणुगोपाल हा टीव्ही मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक ओळखीचा चेहरा होता. काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. सीमा यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली. मी प्रार्थना करतो, सिद्धार्थ यांच्या आत्म्याला शांती मिळो', असं किशोर सत्या म्हणाला.
सिद्धार्थ वेणुगोपाल हे मल्याळम इंडस्ट्रीतील अभिनेता होते. त्यांनी 'कस्तूरीमन' आणि 'भाग्यजातकम्' सारख्या मालिकांमध्ये काम केलं. अभिनयामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. अभिनयाची आवड त्यांना लहानपणापासून होती. त्यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना रंगभूमीतील नाटकांमध्ये भाग घेतला. निर्माते अरुण घोष यांच्या पाठिंब्याने त्यांनी टीव्ही जगतात पाऊल ठेवले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:





















