एक्स्प्लोर

Kangana Ranaut Update: कंगनाला हायकोर्टाकडून दिलासा कायम, कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश

कंगनाला दिलेला दिलासा हायकोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. 25 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. कंगना चौकशीत पुरेसं सहकार्य करत नाही, अशी राज्य सरकारची तक्रार आहे. देशद्रोह प्रकरणात कंगनाची आणखी चौकशी करण्याची गरज असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

मुंबई : कंगना रनौत चौकशीत सहकार्य करत नाही त्यामुळे तिची आणखीन चौकशी करण्याची गरज आहे, असं हायकोर्टात स्पष्ट करत कंगना आणि रंगोलीला आणखीन किमान तीनवेळा चौकशीसाठी बोलावण्याची गरज असल्याचं सरकारी वकिलांनी सोमवारी हायकोर्टात सांगितलं. मात्र वांद्रे पोलीस स्थानकात मुंबई पोलिसांकडनं झालेल्या चौकशीत कंगनानं पूर्ण सहकार्य केलं, अशी भूमिका तिच्या वकिलांनी हायकोर्टात मांडली. मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाला दिलेला दिलासा 25 जानेवारीपर्यंत कायम ठेवत तोपर्यंत त्यांना चौकशीलाही न बोलावण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. दरम्यानच्या काळात मुंबई पोलिसांनी आपला वेळ इतर गंभीर प्रकरणांना द्यावा असा टोलाही खंडपीठानं लागवला.

सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाबद्दल अपमानकारक पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विरोधातील हा एफआयआर रद्द करावा अशी मागणी करत कंगना आणि तिची बहीण रंगोली चंदेलनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

काय आहे प्रकरण -

कंगनाची बहीण रंगोली हिने तबलिगी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करत समाजात जातीय तेढ निर्माण होईल असं एक ट्विट केले होतं. सोशल मीडियावर त्यावर बराच विरोध आणि टीका सुरू होताच आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनानंही एक व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला होता. याप्रकरणी बॉलिवूडमधील एक कास्टिंग डायरेक्टर मुनावर अली सय्यद यांच्या तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. याशिवाय अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनीही अंधेरी कोर्टात त्याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारींची दखल घेत या प्रकरणातील पुरावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने पुढील कारवाईसाठी चौकशी होणं आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं. तसेच संबंधित व्यक्तीची या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती?, हे कळणं गरजेचं असल्यानं याबाबतचा चौकशी अहवाल दिलेल्या मुदतीत पोलिसांनी सादर करावा असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहेत.

कोर्टाच्या या निर्देशांनुसार मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक तक्रार नोंदवली गेली. त्यानुसार कंगना व तिच्या बहिणी विरोधात मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून त्याच्या चौकशीसाठी दोन्ही बहीणी 8 जानेवारी रोजी दोन तासांसाठी वांद्रे पोलीस स्थानकांत हजर झाल्या होत्या. मात्र शूटिंगचं कारण देत यादोघींनी चौकशीला पुरेसा वेळ दिला नाही, असा आरोप सोमवारी सरकारी वकिलांनी हायकोर्टात केला. दंडाधिकारी न्यायालयाच्या या आदेशाला आक्षेप घेत कंगनानं हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करावा तसेच पाठवलेल्या समन्सला स्थगिती द्यावी अशी मागणी करत अॅड. रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत कंगना व तिची बहीण रंगोलीने याचिका दाखल केली आहे. तसेच जोपर्यंत यावर सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपल्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये अशी विनंतीही कंगनाने या याचिकेद्वारे केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Budget 2025 : निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार,बँकांच्या तिजोरीत 45000 कोटी वाढणार, बजेटमधील घोषणा फायदेशीर
निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार, बँकांच्या हाती 45000 कोटींचा खजिना येणार, बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळणार
Rahul Solapurkar: 'राहुल सोलापूरकरांची बहुजनांबद्दलच्या द्वेषाची ब्राह्मणवादी मानसिकता उफाळून बाहेर आली', छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड
शिवाजी महाराज आग्र्यावरुन लाच देऊन पळाले, राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 04 February 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सShrikant Shinde Birthdayबार बार ये दिन आये,श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षावABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 04 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 04 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Budget 2025 : निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार,बँकांच्या तिजोरीत 45000 कोटी वाढणार, बजेटमधील घोषणा फायदेशीर
निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार, बँकांच्या हाती 45000 कोटींचा खजिना येणार, बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळणार
Rahul Solapurkar: 'राहुल सोलापूरकरांची बहुजनांबद्दलच्या द्वेषाची ब्राह्मणवादी मानसिकता उफाळून बाहेर आली', छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड
शिवाजी महाराज आग्र्यावरुन लाच देऊन पळाले, राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड
Walmik Karad: वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
Beed: लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदेंची दांडी, नियोजित बैठकाही रद्द केल्या; राजकीय चर्चांना उधाण
फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदेंची दांडी, नियोजित बैठकाही रद्द केल्या; राजकीय चर्चांना उधाण
Mumbai BMC Budget 2025:  पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, बजेटमध्ये कचरा संकलन शुल्काच्या घोषणेची शक्यता
मुंबईकरांना नवा भुर्दंड, कचरा संकलन शुल्क लागणार? महापालिकेच्या बजेटमध्ये घोषणेची शक्यता
Embed widget