Jai jai Swami Samarth Colours Marathi Serial: भक्तासाठी काळालाही आव्हान देणार स्वामी... 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत पाहायला मिळणार 'अध्याय महानिर्वाणाचा'
Jai jai Swami Samarth Colours Marathi Serial: 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा'मध्ये स्वामींचं वेगळं रुप पाहायला मिळणार आहे.

Jai jai Swami Samarth Colours Marathi Serial: प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ' (Jai jai Swami Samarth) मालिकेनं नुकताच 1800 भागांचा दैदीप्यमान प्रवास पूर्ण केला. आता लवकरच एक अत्यंत थरारक आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. वेदच्या प्रकृतीवर गंभीर संकट ओढवल्यानं अंबादास आणि रेणुका पूर्णपणे खचून जातात, मार्तंड महाराजांनी सुचवलेल्या खित्य उपायांचा काहीच असर होत नाही, ह्या क्षणी स्वामी वेदच्या आईकडून अप्रत्यक्षपणे पुण्याचं काम करवून घेतात आणि अंबादासला सुद्धा अखंड प्रदक्षिणा घालून वेदसाठी प्रार्थना करायला सांगतात. जणू दोघा आई वडिलांच्या श्रद्धेची परीक्षाच असते. पण जेव्हा वेदची प्रकृती प्रचंड खालावते, तेव्हा आशेचा एकमेव किरण म्हणून स्वामींच्या चरणी धाव घेतात. वेद शेवटचा श्वास घेत प्राण सोडतो आणि अंबादास रेणुकाला धक्का बसतो. स्वामी स्थानावर घडणाऱ्या या प्रसंगात आई-वडिलांचा आक्रोश, असहाय्यता आणि श्रद्धेचा संघर्ष प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे. त्याच क्षणी तिथे सगळ्यांना वेद कडे येत असलेली यमाची सावली दिसू लागते. ज्याला थांबवण्यासाठी स्वामी भव्य महाकाळ रूप घेणार आहेत, 'जय जय स्वामी समर्थ, अध्याय महानिर्वाणाचा'मध्ये स्वामींचं वेगळं रुप पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
या संकटाच्या क्षणी वातावरणात एक अदृश्य, भयावह शक्ती सक्रिय असल्याची जाणीव सगळ्यांना होते. परिस्थिती हाताबाहेर जात असताना स्वामी मात्र विलक्षण शांत राहून एक अनपेक्षित विधी करण्याचे निर्देश देतात. त्यांच्या या निर्णयामुळे उपस्थितांमध्ये संभ्रम आणि तणाव निर्माण होतो. जसजसा प्रसंग पुढे सरकतो, तसतसं आध्यात्मिक आणि दिव्य शक्तींचं दर्शन घडू लागतं आणि घटनाक्रम एका मोठ्या, अनपेक्षित वळणाकडे झुकताना दिसतो.
या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामींच्या रूपातून प्रकट होणारी दिव्यता, श्रद्धेची ताकद आणि नशिबाशी चाललेली झुंज यांचा संगम प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार आहे. वेदवर आलेलं हे संकट नेमकं कसं टळणार? जीव कसा वाचणार? स्वामी कशाप्रकारे यात हस्तक्षेप करणार? आणि अंबादास-रेणुकाची श्रद्धा या परीक्षेत कितपत टिकणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा उत्कंठावर्धक भाग नक्की पाहायला हवा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















