Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: ‘देऊळ बंद 2’मध्ये गश्मीर महाजनी नाही, तर पत्नी स्नेहल तरडेला मुख्य भूमिका का? दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले...
Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: 'देऊळ बंद 2'मध्ये गश्मीर महाजनी यानं साकारलेला राघव शास्त्री दिसणार नाही. तर, या सिनेमात एका शेतकरी महिलेची व्यथा मांडण्यात आली आहे.

Pravin Tarade On Casting Of Snehal Tarade: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) गाजलेला सिनेमा 'देऊळ बंद'च्या (Deool Band) पार्श्वभूमीवर आता यातलाच पुढचा भाग 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) येत आहे. नुकताच या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टीझर लाँच (Deool Band 2 Teaser Launch) सोहळा अक्कलकोट इथे श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) यांच्या साक्षीनं पार पडला. या कार्यक्रमाला सिनेमातील कलाकार आणि निर्माते-दिग्दर्शक उपस्थित होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'देऊळ बंद' (Marathi Movie Deool Band) या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. पहिल्या भागात गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) यानं राघव शास्त्रींची मध्यवर्ती भूमिका साकारलेली. त्यामुळे दुसऱ्या भागातही कथा त्याच पात्राभोवती फिरणार, अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांनी मात्र, यावेळी कथाच बदलली आणि त्यासोबतच सिनेमातलं मुख्य पात्रसुद्धा बदललं.
'देऊळ बंद 2'मध्ये गश्मीर महाजनी यानं साकारलेला राघव शास्त्री दिसणार नाही. तर, या सिनेमात एका शेतकरी महिलेची व्यथा मांडण्यात आली आहे. यावेळी सिनेमात अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'धर्मवीर' सिनेमात स्नेहल तरडे हिनं साकारलेल्या बिर्जे बाईंची भूमिका खूपच गाजलेली. अशातच आता 'देऊळ बंद 2'मध्ये स्नेहल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अशातच गश्मीर महाजनीऐवजी स्नेहलला प्रमुख भूमिकेत का निवडण्यात आलं? याबाबत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीत बोलताना नुकतंच स्पष्टीकरण दिलंय. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
'देऊळ बंद 2'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे नेमकं काय म्हणाले? (Pravin Tarade On Deool Band 2)
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना'देऊळ बंद 2'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, "पुरुष बाहेर खूप रुबाबात फिरतो. खतरनाक तरडे, रांगडा प्रवीण तरडे, डॅशिंग प्रवीण तरडे हे सगळं आपण केव्हा मिरवतो जेव्हा घरामध्ये अशी गृहलक्ष्मी असते. नीट पाहिलं तर इंडस्ट्रीला एक शाप आहे की, संसार उध्वस्त होतात, कलाकार एकटे राहतात, अर्धवट संसार मोडतात , माझा अहंकार तुझा अहंकार... माझं करिअर... पण नंतर जेव्हा वय उलटून जातं आणि एकटेपणा माणसाला खायला लागतो, तेव्हा आपल्याला समजून येतं. पण ज्यावेळी नवरा बायको पैकी एक कोणीतरी असं समजूतदार असतं त्यावेळी ते संसार सोन्यासारखे होतात..."
View this post on Instagram
"अभिनयाची सर्व बक्षीस जिंकत असताना एक तेवीस वर्षाची पोरगी ठरवते की प्रवीण आपलं क्षेत्र असं नाहीये की इथे आपल्याला रोज पैसा भेटतो त्यामुळे एक काम कर ... तू काम कर बिनधास्त, मी घर सांभाळते मी नोकरी करते; म्हणून तिने पोलीस डिपार्टमेंट मध्ये नोकरी केली. तिच्या पगारावरती घर चाललं पहिले तीन-चार वर्ष! त्यानंतर माझ्या सिरीयल हिट व्हायला लागल्या... त्यामध्ये 'कुंकू', 'पिंजरा' , 'दूर्वा', 'तुझं माझं जमेना' यांचा समावेश होता. त्यानंतर 'रेघे' सिनेमा लिहिला, 'कुटुंब' लिहिला, 'पितृऋण' लिहिला... हळूहळू पैसे येऊ लागले. हे सगळं तिच्या कष्टांमुळे झालेलं...", असं 'देऊळ बंद 2'चे अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले.
"बरेचदा पुरुष जग पालथं घालतो, पण हे ज्या स्त्रीमुळे घडतं तिचे आभार मानायचे राहून जातात..." (Pravin Tarade On Snehal Tarade)
पुढे बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, "मुलाच्या शाळेची फी तिच्या पगारातून भरली जायची. त्यामुळे माझी ही एक जबाबदारी होती. जर प्रवीण तरडे कोण? हे जगाला कळलं असेल, तर ते तिने योगदान दिलं म्हणून... बरेचदा पुरुष जग पालथं घालतो, पण हे ज्या स्त्रीमुळे घडतं तिचे आभार मानायचे राहून जातात , तिच्या उपकाराची परतफेड करायची राहून जाते. त्यामुळे स्नेहलने जे काही माझ्यासाठी केलं त्यासाठी मी हे थोडंसं केलं."
"... तू खूप मोठी अभिनेत्री आहेस" (Pravin Tarade Dircted Deool Band 2)
"काहीच नव्हतं माझ्याकडे. साध्या दहा बाय दहाची खोलीत आम्ही राहायचो. त्याचे पैसे भरायलाही पैसे नव्हते तेव्हा ती म्हणायची की, काळजी करू नकोस पाच तारखेला माझा पगार होईल तेव्हा भरू. त्यानंतर 'देऊळ बंद' आला, 'मुळशी पॅटर्न' आला, अगदी 'सर सेनापती हंबीरराव' येईपर्यंत ती नोकरी करत होती. 'मुळशी पॅटर्न'मुळे माझं लाईफ बदललं, तेव्हा मी तिला म्हणालो की, स्नेहल आता नोकरी करणं थांबव आणि अभिनय करणं सुरू कर... तू खूप मोठी अभिनेत्री आहेस. तिने जे काही सुरू केलं... 'धर्मवीर'मध्ये एकच बिरजेबाईची झलक दिली आणि त्यावर्षीची सगळी बक्षीस तिनं मिळवली. प्रसाद ओकनं आपल्या अभिनयानं तो सिनेमा व्यापून टाकला होता, पण त्यामध्ये बिरजेबाई जे काही भाव खाऊन गेली त्यात तिनं सर्व अभिनयाची पारितोषिक जिंकली...", असं प्रवीण तरडे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















