एक्स्प्लोर

Salman Khan Firing Case : भाईजानच्या घरावरील गोळीबाराआधी बिश्नोईचे 9 मिनिटाचे भाषण; हल्लेखोरांना म्हणाला, घाबरू नका तुम्ही...

Salman Khan Firing Case : सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी गँगस्टर आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांसाठी 9 मिनिटांचे भाषण केले असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

Salman Khan Firing Case : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरावर बिष्णोई गँगने गोळीबार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. सलमानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी गँगस्टर आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईने हल्लेखोरांसाठी 9 मिनिटांचे भाषण केले असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. अनमोल बिश्नोईने आपल्या भाषणातून हल्लेखोरांचे मनोधैर्य वाढवले.
  
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून ही बाब समोर आली आहे. 

अनमोलने दिले 9 मिनिटांचे भाषण

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील तपासानंतर कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार,  आरोपी अनमोल बिश्नोई याने हल्लेखोर सागर पाल आणि विकी गुप्ता या दोघांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी एक भाषण दिले. आपल्या भाषणात अनमोलने म्हटले की, घाबरू नका, आत्मविश्वासाने तुम्हाला हे काम पूर्ण करायचे आहे. तु्म्ही आपल्या समाजासाठी चांगले काम करत आहात, असे अनमोलने म्हटले. ऑडियो चॅटच्या माध्यमातून अनमोलने हल्लेखोरांना संबोधित केले होते. जवळपास 9 मिनिटाचे हे भाषण आहे. 

अनमोलने भाषणात काय म्हटले?

आपल्या भाषणात अनमोल बिश्नोई याने सांगितले की, तुम्ही आपल्या आयुष्यातील सगळ्यात चांगले काम करण्यास जात आहात, हे काम चांगल्या पद्धतीने करा. हे काम पूर्ण होताच, तुम्ही एक इतिहास रचणार आहात. जे काम करण्यास जात आहात, ते धर्माचे काम आहे. त्यामुळे दिलेली जबाबदारी पार पाडताना मनात कोणतीही भीती बाळगू नका असे त्याने म्हटले. त्याने पुढे म्हटले की, हे काम करणे म्हणजे समाजात बदल घडवण्यासारखे आहे. समाज सुधरवणे आणि ज्यांनी चुकीचे काम केलंय त्यांना शिक्षा देण्यासाठी हे काम आपण करत असल्याचे अनमोल बिश्नोईने आपल्या भाषणात म्हटले. 

अनमोलने पुढे म्हटले की, बिश्नोई गँगचे एक वैशिष्ट्य आहे. जेव्हा कधी आपण असे काम करतो तेव्हा पूर्ण मॅगझीन रिकामी करतो. तुम्हीदेखील सलमान खानच्या घराबाहेर जाऊन पूर्ण मॅगझीन रिकामी करा असे त्याने म्हटले. मात्र, सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा रक्षक दिसल्याने हल्लेखोर घाबरले आणि त्यांनी बाईक न थांबवता सलमान खानच्या घरावर गोळीबार केला आणि फरार झाले. 

इतर संबंधित बातमी: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget