एक्स्प्लोर

नाना पाटेकरांची 'हाऊसफुल्ल 4' सिनेमातून माघार

तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर निर्माण झालेल्या वादाचा फटका सिनेमाला बसू नये यासाठी नाना पाटेकर यांनी सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : तनुश्री दत्ताने केलेले छेडछाडीचे आरोप आणि अक्षय कुमारनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर नाना पाटेकर हाऊसफुल्ल-4 मधून स्वत: पायउतार झाले आहेत. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर निर्माण झालेल्या वादाचा फटका सिनेमाला बसू नये यासाठी नाना पाटेकर यांनी सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं मुलगा मल्हार पाटेकरनं स्पष्ट केलं.

"सध्या सुरू असलेल्या वादामुळे कोणालाही अडचण निर्माण होऊ नये. वाद-विवाद टाळण्यासाठी आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये. तसेच चुकीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाचा फटका सिनेमाला बसू नये यासाठी त्यांनी हाउसफूल्ल-4 सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे", असं नाना यांचा मुलगा मल्हारने सांगितलं.

याआधी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने 'हाऊसफुल्ल 4' चं चित्रीकरण रद्द केलं आहे. कारण या सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खानवरही लैंगिक अत्याचाराचा आरोप लागला आहे.

अक्षय कुमारने ट्वीट करत 'हाऊसफुल्ल 4' चं चित्रीकरण रद्द केल्याची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने लिहिलंय की, "मी आताच भारतात परतलो असून काही बातम्या वाचल्या. तपास पूर्ण होईपर्यंत चित्रीकरण रद्द करण्याची विनंती मी 'हाऊसफुल्ल 4' च्या निर्मात्यांना केली आहे. अशा आरोपांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जो दोषी सिद्ध होईल, त्याच्यासोबत मी काम करणार नाही. ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत, त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळाला हवा."

साजिदवर लैंगिक अत्याचाराचा आरोप पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तर साजिदने अनेक महिने माझं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप 'हमशक्ल' सिनेमात साजिदची सहदिग्दर्शक असलेली सलोनी चोप्राने केला आहे. याशिवाय अभिनेत्री रॅचेल व्हाईटनेही साजिदवर आरोप केले होते.

साजिद खानची माघार तर दुसरीकडे या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारत साजिदने स्वत:च 'हाऊसफुल्ल 4' च्या दिग्दर्शनातून माघार घेतली आहे. "सत्य समोर येईपर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत जाऊ नका," असं आवाहन साजिदने ट्विटरच्या माध्यमातून मीडियाला केलं आहे. तसंच कुटुंब आणि सिनेमाच्या निर्मात्यांवर दबाव येत असल्याने हा निर्णय घेतल्याचं साजिदने सांगितलं.

आमीर खानचा निर्णय अक्षय कुमारआधी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने गुलशन कुमार यांच्या 'मुगल' या बायॉपिकमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूरवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर आमीरने हा निर्णय घेतला होता. तर या आरोपांनंतर चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी सुभाष कपूरकडून दिग्दर्शनाची जबाबदारी काढून घेतली होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Beed Crime: बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, दोरखंडातून सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
बीडमध्ये माणुसकीची अब्रू गेली, अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार, सोडवायला एकही गावकरी पुढे आला नाही
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Embed widget