एक्स्प्लोर
Advertisement
होळीला काटेश्वराची झाडं जाळण्याची प्रथा थांबवा, सयाजी शिंदेंचं आवाहन
मुंबई : होळीच्या दिवशी वाईट गोष्टींना जाळण्याचा हेतू केंद्रभागी ठेवून झाडांना जाळलं जातं. मात्र यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असल्याने झाडं जाळण्याची प्रथा बंद व्हावी, असं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केलं आहे.
अभिनेते सयाजी शिंदेंनी लावलेली झाडं अज्ञातांनी तोडली!
होळीच्या दिवशी प्रामुख्याने अनेक भागात काटेश्वर नावाच्या झाडाची होळी केली जाते. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने हे झाड अंत्यत महत्वाचं असल्याचंही सयाजी शिंदे यांनी सांगितलं.सयाजी शिंदेंच्या झाडांवर कुऱ्हाड चालवणारा विकृत सापडला!
होळी मोठी करण्याची गावागावत स्पर्धा लागते. त्यामध्ये काटेश्वराची झाडं मोठ्या प्रमाणात जाळली जातात, पण त्यामुळे निसर्गासोबतच हजारो पशुपक्षांचंही नुकसान होतं, असं सयाजी शिंदे म्हणाले.अभिनेते सयाजी शिंदेनी लावलेली झाडं तोडणारा छगन मदने अटकेत
काटेश्वर झाडाला उन्हाळ्यात फुलं येतात, त्यात दव साचतं. 40 ते 50 प्रकारचे पक्षी हे पाणी पितात आणि होळीला ही झाडं आपण जाळतो, त्यामुळे किमान पक्ष्यांचा विचार करुन तरी झाडं जाळू नये, असं आवाहन सयाजी शिंदेंनी केलं. पाहा व्हिडिओ :
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement