एक्स्प्लोर

Rajesh Khanna Slapped Sanjeev Kumar: एक गैरसमज अन्.... राजेश खन्ना यांनी लगावली होती संजीव कुमारच्या कानाखाली, काय घडलं होतं नेमकं?

Rajesh Khanna Slapped Sanjeev Kumar: एका गैरसमजातून राजेश खन्ना यांनी अभिनेते संजीव कुमार यांच्या कानशिलात लगावली होती.

Rajesh Khanna Slapped Sanjeev Kumar:  हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार असलेले दिवंगत अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांना खूप स्टारडम लाभले. राजेश खन्ना यांनी काम केलेले चित्रपट आजही पाहिले जातात. 
वर्ष 1969 ते 1974 या काळात  राजेश खन्ना हे केवळ हिंदी चित्रपटसृष्टीचेच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार होते. पण 1970 च्या दशकाच्या मध्यात एंग्री यंग मॅन अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची एन्ट्री झाली आणि राजेश खन्ना यांच्या स्टारडमला धक्के बसू लागले. 

मात्र, राजेश खन्ना यांची लोकप्रियता इतकी वाढली होती की आजही त्यांच्या आयुष्याशी आणि करिअरशी संबंधित अनेक किस्से शेअर केले जातात. अशाच एका घटनेचा उल्लेख केला जातो.राजेश खन्ना यांचे सहकलाकार संजीव कुमारसोबत भांडण झाले होते. राजेश खन्ना यांनी तर संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांच्या कानशिलात लगावली होती. या दोघांमध्ये नेमकं घडलं काय?

या अभिनेत्रीमुळे झाला दोन्ही कलाकारांमध्ये गैरसमज

राजेश खन्ना आणि त्यांची एक्स गर्लफ्रेंड अंजू महेंद्रू यांच्यातील गैरसमजामुळे अभिनेत्याने संजीव कुमारवर हात उचलला होता. राजेश आणि अंजू 1966 ते 1972 पर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. पण अंजूने राजेश खन्ना यांचा लग्नाचा प्रस्ताव वारंवार नाकारल्याने हे नाते तुटले. राजेश आणि अंजू यांनी वेगळ्या वाटा निवडल्या. या काळात संजीव कुमार आणि अंजू महेंद्रू यांच्यात चांगली मैत्री झाली. पण, त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले.  या अफवांमुळे अंजू महेंद्रू यांना त्रास सहन करावा लागला. 

संजीव कुमार आणि अंजू यांच्या अफेअरच्या अफवा 

अंजू यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत हा संपूर्ण प्रकार सांगितला होता. त्यांनी सांगितले की, राजेश खन्नासोबतचे नाते तुटल्यानंतर कोणीतरी संजीवसोबत तिच्या अफेअरची अफवा पसरवली होती. हे ऐकून राजेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अंजू यांनी पुढे सांगितले की,'मला हरीबद्दल (संजीव कुमार) कधीच आकर्षण वाटले नाही. माझ्यासाठी तो माझ्या आईचा भाऊ होता. एका अभिनेत्रीने माझे हरीसोबत अफेअर असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. राजेशला ही आमचं नातं तुटल्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, असे वाटत होते. अखेर आम्ही दोघांनी वाटा वेगळ्या केल्याच्या बराच काळानंतर आपला गैरसमज झाला होता, याची जाणीव राजेश खन्नाला झाली होती असे अंजू यांनी सांगितले. 

राजेश खन्ना यांनी संजीव कुमार यांना कानशिलात लगावली...

अंजू यांनी पुढे म्हटले की, जेव्हा हरी आणि राजेश यांनी एकत्रितपणे एका चित्रपटात काम केले. त्यावेळी एका सीनमध्ये राजेशला हरीच्या कानशिलात लावायची होती.  त्या सीनमध्ये राजेशने खरंच जोरदार कानशिलात लगावली. राजेश खन्ना आणि संजीव कुमार या दोघांमध्ये कधीच पटले नाही, असेही अंजू यांनी सांगितले. 

अंजू महेंद्रू आणि राजेश  खन्ना यांच्यात 1988 नंतर पुन्हा संवाद सुरू झाला होता. त्यानंतर या दोघांमधील मैत्रीचे नाते हे राजेश खन्ना यांच्या निधनापर्यंत कायम होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
न्यूझीलंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचा धुरंदर थेट मालिकेतून बाहेर पडल्याने तगडा झटका; नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडू बरगडीला लागला, मैदानात वेदनेनं तळमळला
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, पाटील यांची प्रकृती स्थिर, चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरु
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
Embed widget