एक्स्प्लोर

जालन्यात महायुतीत बंडखोरी, अर्जुन खोतकर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, भास्कर दानवे माघार घेणार का?

जालना विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज अर्जुन खोतकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत.    

Arjun Khotkar meets Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील अनेक मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळं नेत्यांची डोखेदुखी वाढली आहे. जालना विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्याविरोधात रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे (Bhaskar Danve) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज खोतकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.    

महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरु

शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी अर्जुन खोतकर पोहोचले आहेत.
जालन्यात महायुतीत बंडखोरी झाली आहे. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीतील नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच अर्जुन खोतकर हे नागपूरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले आहे. 

महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता

भास्कर दानवे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पदावर आहेत. भाजप कार्यकर्त्यांसोबत दुचाकी रॅली काढत भास्कर दानवेंनी अर्ज भरला आहे. मैत्रिपूर्ण लढतीसाठी आम्ही आग्रही असल्याची भूमिका भास्कर दानवे यांनी घेतली आहे. दरम्यान, जालना विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाला सुटला आहे. त्यामुळं या मतदारसंघातून अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, या जागेवर भाजपने देखील दावा केलाय. त्यामुळं या जागेवरुन महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झालीय.  जालन्याची जागा ही महायुतीत भाजपला सोडण्यात यावी यासाठी दानवे आग्रही होते. मात्र ही जागा परंपरागत शिवसेनेकडे असल्यानं खोतकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले भास्कर दानवे यांनी भाजप  कार्यकर्त्यांसह दुचाकी रॅली काढत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज भरायला आणखी चार दिवस बाकी असून अजूनही भाजपला ही जागा सोडतील अशी आशा भास्कर दानवे यांनी व्यक्त केली आहे. या मतदारसंघात 2009 पासून काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) अशीच दुहेरी लढत होत आलेली आहे. तेव्हापासून आलटून पालटून या दोन्ही उमेदवारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. कैलास गोरंट्याल हे देखील यावेळी पुन्हा मैदानात उतरले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

जालन्यात महायुतीत बंडखोरी! अर्जुन खोतकरांच्या विरोधात दानवे मैदानात, शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Uddhav Thackeray on BMC Election: मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget