एक्स्प्लोर

Tejashwi Yadav : हरता हरता जिंकले! तेजस्वी यादवांनी राघोपूरचा गढ राखला, भाजपचा 14 हजार मतांनी पराभव

Bihar Election Eesult 2025 : राघोपूर मतदारसंघामध्ये या आधी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि आता तेजस्वी यादव यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. तेजस्वी यादव यांनी तिसऱ्याला विजय मिळवला आहे.

Bihar Election Eesult 2025 : आरजेडीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी त्यांच्या पारंपरिक राघोपूर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तेजस्वी यादव यांनी भाजपच्या सतीश कुमार यांचा 14 हजार मतांनी पराभव केला. एक वेळ अशी होती की तेजस्वी यादव पिछाडीवर होते, त्यांचा पराभव होतो की काय अशी परिस्थिती होती. शेवटी तेजस्वी यादव यांनी विजय मिळवला.

तेजस्वी यादव – 1,18,597 मतं

सतीश कुमार – 1,04,065 मतं

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तेजस्वी यादव पिछाडीवर पडले होते, निकाल सातत्याने वर खाली होत होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात तेजस्वी यादवांनी पुन्हा आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला.

Tejashwi Yadav Raghopur Result : कुटुंबाचा पूर्ण जोर राघोपूरमध्ये

यंदाच्या निवडणुकीत राघोपूरमध्ये तेजस्वी यादव यांच्यासमोर भाजपने मोठं आव्हान उभं केलं होतं. तसेच यादव परिवाराचे पारंपरिक मतदार असलेला यादव समूदाय मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे संपूर्ण यादव परिवाराला राघोपूरमध्ये ठिय्या मांडावा लागल्याचं दिसून आलं. माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मीसा भारती, रोहिणी आचार्य या सर्वांनी राघोपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार केला.

Raghopur Election Result : लालू परिवाराची परंपरा कायम

राघोपूर सीट लालू यादव यांच्या कुटुंबाची परंपरागत जागा मानली जाते. या आधी या मतदारसंघातून लालू प्रसाद यादव हे 1995, 2000 साली निवडून आले होते. त्यानंतर राबडी देवींनी या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. त्याच्यानंतर तेजस्वी यादव यांनी 2015, 2020, 2025 असा सलग तीन वेळा विजय मिळवला. 2010 मध्ये भाजपचे सतीश राय या मतदारसंघातून जिंकले होते, पण त्यानंतर पुन्हा लालू परिवाराचा दबदबा कायम राहिला.

Maharashtra Pattern In Bihar : बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न

बिहारच्या निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवत महागठबंधनला पराभवाची धूळ चारली आहे. मात्र या निवडणुकीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसून आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआला 50 जागांचा आकडाही ओलांडता आला नव्हता.

ठाकरेंच्या पक्षाला 21, काँग्रेसला16 तर, पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या होत्या. त्याप्रमाणेच बिहारमध्ये महागठबंधनमधील आरजेडीला 24 तर, काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारं संख्याबळ विरोधकांना गाठता आलेलं नाही.

महाराष्ट्रात राबलेल्या लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला होता. त्याप्रमाणे बिहारमध्येही मुख्यमंत्री लाडली बहीण योजना राबवण्यात आली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा एनडीएला निवडणुकीत मिळाला आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget