एक्स्प्लोर

Shubha Raul : दोन वर्षांपासून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार, आता मला समाजसेवा करायची आहे; ठाकरेंची साथ सोडल्यावर शुभा राऊळ काय म्हणाल्या?

Shubha Raul Joins BJP : हिंदुत्व हा बाळासाहेबांचा श्वास होता, उद्धव ठाकेरेंनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला तो पटला नव्हता, पण आम्ही त्यावेळी काही बोलू शकलो नाही असं शुभा राऊळ म्हणाल्या.

मुंबई : माझे वडील संघाशी जोडलेले होते, त्यामुळे माझे मनही तिकडेच होते. भाजपमध्ये प्रवेश हा काही अचानक झाला नाही, दोन वर्षांपासून त्यावर चर्चा सुरू होती असं शुभा राऊळ (Shubha Raul) म्हणाल्या. उद्धव ठाकरेंबद्दल आपल्या मनात काही नाराजी नाही. आता निवडणूक लढायची नाही तर मला समाजसेवा करायची आहे असंही शुभा राऊळ म्हणाल्या. ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शुभआ राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला. माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईत कांदिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेदरम्यान शुभा राऊळ यांचा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, शुभा राऊळ यांनी आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झाला.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शुभा राऊळ यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.

प्रश्न - ठाकरेंची साथ सोडून भाजप मधे जाण्याचा निर्णय का घेतला?

उत्तर - नाराजी असं काही नाही. काम करण्यासाठी मला स्टेज मिळत आहे. आरोग्य, पर्यावरण या विषयावर काम करायचं आहे. भाजपमध्ये प्रवेश आताच केला असं नाही, मागील दोन वर्षांपासून प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. मला आता निवडणुक लढायची नाही, मला आता केवळ समाजसेवा करायची आहे. माझे वडील संघाशी जोडलेले आहेत. गोवा मुक्ती संग्रामात ते होते. माझ मन तिकडे होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी नाही.

प्रश्न - मुंबईचे प्रथम नागरिक केले, त्यांची साथ सोडली. नेमकं काय झालं?

उत्तर - हिंदुत्व हा बाळासाहेब ठाकरे यांचा श्वास होता. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी हे व्हायला नको असं वाटत होतं. गळ्यापर्यंत हा विषय आला होता. परंतु हे घडलं तेव्हापासून मी नाराज होते. त्यावेळी आम्हाला आवाज नव्हता, त्यामुळे काहीच बोलता आलं नाही.

प्रश्न - देवेंद्र फडणवीस हे ठाकरेंवर काहीच कामे केली नाहीत अशी टीका करत होते, त्यावेळी ते थेट तुमच्या महापौरपदाच्या कार्यकाळावर प्रश्न उपस्थित करत होते.

उत्तर - कामे केलीच नाहीत असं अजिबात नाही. हे राजकीय मुद्दे आहेत. एकमेकांवर टीका होणारच. मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ,कोणतीही वाईट वर्तणूक केलेली नाही. कामे केली की नाही हे लोक ठरवतील.

भाजप प्रवेश करण्यापूर्वी ठाकरेंसोबत कोणतंही बोलण झालं नाही. आपली आरोग्य आणि पर्यावरणाची अनेक धोरणं चुकीची आहेत. त्यावर काम करण्यासाठी मी भाजपमध्ये आले आहे.

Shubha Raul Profile : शुभा राऊळ यांचा परिचय

  • 2007 ते 2009 दरम्यान मुंबई महापालिकेच्या महापौर.
  • सलग तीन वेळा दहिसरमधून नगरसेविका.
  • 2014 साली मनसे पक्षातून लढवलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव.
  • विधानसभेतील पराभवानंतर शिवसेनेत स्वगृही परतल्या.
  • शिवआरोग्य सेनेच्या अध्यक्ष.
  • कोरोना काळात आयुष टास्क फोर्सच्या सदस्या.

ही बातमी वाचा:

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report
Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget