एक्स्प्लोर

Raj Thackeray : मुंबई गुजरातला जोडण्याचं काम सुरू, मुंबईत मराठी टक्का मोठा, मतदानासाठी त्यांनी बाहेर पडावं; राज ठाकरेंचा वादळी 'कट्टा'

Raj Thackeray Majha Katta : मुंबई विमानतळाचं महत्व कमी करून ती जागा उद्योगपतीच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

मुंबई : मुंबईत मराठी माणसाचा टक्का हा कमी नाही, मराठी माणसाची संख्या मोठी आहे. पण मराठी माणसाचा टक्का कमी असल्याची अफवा उठवायची आणि त्याचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. मुंबई थेट तोडता येत नाही, पण ती गुजरातला जोडण्यासाठी पद्धतशीरपणे आखणी केली जात आहे, मुंबई ते सुरत तसा मार्ग विकसित केला जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा वादळी कट्टा एबीपी माझावर शुक्रवारी सकाळी 9 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे.

मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या ही कमी नाही, पण मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी झाल्याची अफवा उठवण्याचं काम भाजपकडून सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्या माध्यमातून मतदारांवर नकारात्मक परिणाम आणि मराठी माणसाचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यामुळे आता मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

Raj Thackeray BMC Election : मुंबई गुजरातला जोडण्याचा प्लॅन तयार

मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, मुंबई ही गुजरातला मिळाली नाही ही काही लोकांची जखम अजूनही भळभळते असा आरोप अनेकदा राज ठाकरे यांनी केला आहे. आताही तोच आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि गुजरातला जोडण्याचा पद्धतशीरपणे डाव आखण्यात आला आहे. त्यासाठी नवी मुंबई, पालघर-वाढवण बंदर आणि पुढे गुजरात असा पट्टा एकमेकांना जोडला जात आहे. बुलेट ट्रेनचा मार्गही तशाच पद्धतीने आखण्यात आला आहे. या सगळ्या माध्यमातून मुंबई गुजरातला हळूहळू जोडली जात आहे.

यामागील आणखी एक गोष्ट म्हणजे मुंबई विमानतळाचं महत्त्व संपूर्णपणे कमी करण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखला असल्याचा आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला. नवी मुंबई विमानतळाच्या माध्यमातून या गोष्टी केल्या जात आहेत. येत्या काळात मुंबई विमानतळ गायब करून ती जागा उद्योगपतीच्या घशात घालायची असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray Mumbai Election : प्रशासकांमार्फत चुकीच्या गोष्टी

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ संपूण तीन-चार वर्षे उलटली, मधल्या काळात प्रशासकांकडून कामं करुन घेण्यासाठी निवडणुका न घेता त्या पुढे ढकलण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, "मुंबई महापालिकेचा कार्यकाळ हा 2022 मध्ये संपला. या मधल्या काळात काय केलं? महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि दुसरे पक्ष जर सत्तेत आले तर त्याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी मधल्या काळात, विशेषतः 2024-25 मध्ये प्रशासकाकडून काही गोष्टी करुन घेतल्या. त्यासाठी या निवडणुकांना उशीर करण्यात आला."

Raj Thackeray On BJP : एवढा माज कुठून येतो?

भाजपकडून जर मुंबईचा विकास केल्याचा दावा केला जात असला तर पैसे वाटायची वेळ का येते असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. काही मुठभर लोकांवरुन पूर्ण समाजाचं चित्रण मांडू शकत नाही. प्रत्येक मतदार हा विकला जात नाही. त्याचा एक विचार आहे, त्याचंही एक मत आहे असं राज ठाकरे म्हणाले.

निवडणुकीत काहीही होऊ शकतं हे माहिती असल्यामुळे या आधीचे सत्ताधारी निवडणुकीमध्ये नम्र असायचे. पण आता तसं दिसत नाही. काहीही झालं तरी आपणच निवडून येणार हे त्यांना ठाम माहिती असतं. त्यामुळेच त्यांचे सगळे उलटे धंदे सुरू असतात. मग यांचा हा माज येतो कुठून? असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
Uday Samant: 'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
Vinayak Raut On Bal Mane : 'उद्धव ठाकरे अडीच वाजेपर्यंत थांबले, पण हा माणूस...; बाळ मानेंच्या 'त्या' खेळीवर विनायक राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणून'
'उद्धव ठाकरे अडीच वाजेपर्यंत थांबले, पण हा माणूस...; बाळ मानेंच्या 'त्या' खेळीवर विनायक राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणून'

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
GDP Growth : मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
Embed widget