एक्स्प्लोर

Punjab Election : चन्नी आणि सिद्धू यांची गळाभेट, मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर काय म्हणाले चन्नी?

काँग्रेसकडून  विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ही घोषणा केली.

Punjab Assembly Election 2022 : गेल्या अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. अखेर काल (रविवार) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत केला आहे. काँग्रेसकडून  विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळाले होते. अखेर काँग्रेस हायकमांडने चन्नी यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा केल्यानंतर चन्नी ट्वीट करुन काँग्रेसचे हायकमांड आणि पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चन्नी यांनी सिद्धू यांना मिठी मारल्याचे पाहायला मिळाले.

कालचा दिवस पंजाब काँग्रेससाठी खूप महत्त्वाचा होता. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन चर्चा होती. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राहुल गांधी यांनी चन्नी यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर चन्नी यांनी काँग्रेस हायकमांडने माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल राहुल गांधींसह पंजाबच्या जनतेचे आभार मानलेत. गेल्या 111 दिवसांपासून मी पंजाबला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला पंजाबला नव्या जोमाने प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे आश्वासन देत असल्याचे चन्नी यांनी 

पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा चेहरा घोषीत झाल्याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी राहुल गांधी सतत प्रचारात गुंतले आहेत. चन्नीजी मुख्यमंत्री झाले, त्यांना कोणताही अहंकार नाही, ते लोकांमध्ये जातात असे गांधी म्हणाले. तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेमध्ये जाताना, रस्त्यात एखाद्याला मदत करताना पाहिले आहे का? करणार नाहीत कारण ते राजा आहेत, पंतप्रधान नाहीत असा टोला देखील राहुल गांधी यांनी लगावला. काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आल्यावर सिद्धू यांनी 'चन्नी साहब, टाली ठोको 'असे सांगितले. हे ऐकून चन्नी उठले आणि त्यांनी सिद्धू यांना मिठी मारली. यावेळी सिद्धू यांनी शेर वाचून राहुल गांधींची स्तुतीही केली. 

पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली आहे. चन्नी यांच्या नेतृत्वातच पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवावी असे लोकांचे म्हणणे आहे. तर 21 टक्के लोकांनी सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली पाहिजे असे 21 टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर 27 टक्के लोकांनी दोघांच्याही नावाला नकार दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी याबाबत माहित नसल्याचे उत्तर दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indore Accident: घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
घाटातील तीव्र उतारावर भरधाव ट्रकची धडक, पिकअप थेट कारवर चढली, तब्बल 7 वाहनांचा चेंदामेंदा; मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर थरार
Charter Plane Crash: 9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
9 आसनी चार्टर्ड विमान कोसळले, पायलटसह 6 जण गंभीर जखमी; भीषण अपघात नेमका घडला तरी कसा?
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत
Prakash Ambedkar on Badlapur Nagarsevak: भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भाजप हा खाणाऱ्यांचा पक्ष होताच, तो आता बलात्कारातील आरोपींचा पक्ष झाला, व्यभिचाराचा मार्ग RSS भाजपने अवलंबला आहे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
देवाच्या नावाखाली 60 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच शक्तिपीठ महामार्ग; त्यापेक्षा विदर्भ ते कोकण जोडणारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करा; राजू शेट्टींचा हल्लाबोल
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
पुण्यात मेट्रो मोफत, अजित पवारांची घोषणा; पण महापालिकेला अधिकार आहे का? सध्या प्रवासी, तिकीट उत्पन्न किती?
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
Embed widget