एक्स्प्लोर

इमानदारांच्या पैशांवर टाच येऊ देणार नाही, बेईमानांवर कारवाई होणारच : नरेंद्र मोदी

पाच वर्षांपूर्वी मुंबईतल्या विकासापेक्षा मंत्रालयातील 'इंफ्रास्ट्रक्चर'वर जास्त विचार व्हायचा. मंत्रालयात कुणाला मुख्यमंत्री करायचं, कुणाला खाली खेचायचं अशी कामं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात व्हायची. मात्र आम्ही लोकांसाठी कामं केली. त्याचमुळं पन्नास वर्षांनंतर महाराष्ट्राला सलग पाच वर्षे मुख्यमंत्री लाभला.

मुंबई :  इमानदारांच्या पैशांवर टाच येऊ देणार नाही तर बेईमानांवर कारवाई होण्यापासून कुठलीच ताकद थांबवू शकत नाही, आता जर कोणी चूक केली तर त्याला शिक्षा मिळणारच, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  मुंबईतील बीकेसीमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करत पुन्हा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'माझे लहान बंधू' असा केला. यावेळी मोदी म्हणाले की, मागच्या पाच वर्षांत केंद्र किंवा राज्यात भ्रष्टाचाराचा एकही डाग आमच्यावर लागला नाही. भाजपच्या मुळात जनभागीदारी आहे. गरिबांना सशक्त बनवण्यासाठी अनेक प्रयत्न आम्ही केले आहेत, असे मोदी म्हणाले.  घाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? आघाडीने तर आदर्श घोटाळा करुन लष्करातल्या जवानांच्या घराबाबतही घोटाळा केला असाही आरोप  नरेंद्र मोदींंनी केला. मोदी पुढे म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात मेट्रोच्या कामाची गती कासवालाही लाज वाटेल अशी होती. मुंबईत घर घेण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्यांना रियल इस्टेट माफियांपासून कुठलंच संरक्षण नव्हतं. रेरा कायदा आणून घरमालकांचा आवाज बुलंद केला.  लाखोंना परवडणारी घरं दिली तर लाखोंना घरं देणार आहोत. घरकर्जाच्या व्याजदरात सवलत दिली, ज्यामुळे चार ते पाच लाखांचा दिलासा मिळतो, असेही मोदी म्हणाले. लोकांच्या पैशांवर डल्ला मारणारे काही तिहार जेलमध्ये आहेत तर काही इथल्या जेलमध्ये आहेत. आता तर साफसफाईची सुरुवात झालीय, अजून खूप वेगाने काम होणार आहे.  इमानदारांच्या पैशांवर कोणतीही टाच येऊ देणार नाही तर बेईमानांवर कारवाई होण्यापासून कुठलीच ताकद थांबवू शकत नाही, असेही मोदी म्हणाले. मुंबईशी आमचं गर्वाचं नातं आहे. कारण आमच्या पक्षाचा जन्म या मुंबईच्या धर्तीवर झाला. मुंबईच्या धर्तीची मोठी महानता आहे. मुंबईत ह्युमन कॅपिटल, व्हेंचर कॅपिटल आहे.  जगभरातील गुंतवणूकदारांना मुंबईत यायचं आहे, असेही ते म्हणाले. पाच वर्षांपूर्वी मुंबईतल्या विकासापेक्षा मंत्रालयातील 'इंफ्रास्ट्रक्चर'वर जास्त विचार व्हायचा. मंत्रालयात कुणाला मुख्यमंत्री करायचं, कुणाला खाली खेचायचं अशी कामं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात व्हायची.  मात्र आम्ही लोकांसाठी कामं  केली. त्याचमुळं पन्नास वर्षांनंतर महाराष्ट्राला सलग पाच वर्षे मुख्यमंत्री लाभला. हे तुमच्यामुळे शक्य झालं. तुम्ही स्थैर्य निवडलं, असे मोदी म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
Satara Zilla Parishad: साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
Baramati And Rahuri Constituency By Election 2026: सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?; बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार, सर्व्हे आला समोर
सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?; बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार, सर्व्हे समोर
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget