एक्स्प्लोर

Mamata Banerjee : पराभूत झालेले नाही, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही, राजभवनात जाणार नाही, ममता बॅनर्जींचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.   

Mamata Banerjee कोलकाता : पश्चिम बंगालच्या मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज पत्रकार परिष घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं. याशिवाय ममता बॅनर्जींनी निवडणूक निकालानंतर कोणत्या कोणत्या नेत्यांचे फोन आले याची नावं पत्रकार परिषदेत सांगितली.  पश्चिम बंगालमधील 293 पैकी 80 जागांवर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा विजय  झाला. ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव आणि हेमंत सोरेन यांचा फोन आल्याचं सांगितलं. 

ममता बॅनर्जी पुढं म्हणाल्या की इंडिया आघाडीतील सर्व पक्षांकडून ते पूर्णपणे आमच्या सोबत असल्याचं सांगितलं. आमची एकता पुढील काळात आणखी भक्कम होईल, असं त्या म्हणाल्या. अखिलेश यादव यांनी आज बंगालमध्ये येण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यांना उद्या यावं असं सांगितल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या. एका पाठोपाठ एक असे सर्व जण येतील. माझं  लक्ष्य स्पष्ट आहे. एका लहान व्यक्तीप्रमाणं मी इंडिया आघाडीचा टीम मजबूत करणार आहे.  आता माझ्याकडे कोणतंही पद नाही, आता मी सर्वसामान्य आहे, त्यामुळं तुम्ही आता मला पदाचा वापर करताय असं म्हणून शकत नाही, आता मी मुक्त आहे. मी माझं सर्व आयुष्य लोकांच्या सेवेसाठी दिलं आहे. गेल्या 15 वर्षात पेन्शनमधून एक रुपया घेतला नाही, पगाराचा एक पैसा देखील घेतलेा नाही. मी आता मुक्त असून आता मला काही काम करायचं आहे, मी ते करणार आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं. 

ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं, मी पराभूत झालेली नाही, मी राजभवनात जाणार नाही, तो प्रश्नच येत नाही. आम्ही पराभूत झालेलो नाही, त्यांनी आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. अधिकृतपणे निवडणूक आयोगा मार्फत ते आम्हाला पराभूत करु शकतात मात्र नैतिक दृष्ट्‍या निवडणूक  जिंकल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 

मुख्य निवडणूक आयुक्त व्हिलन : ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगानं लोकशाही अधिकारांची लूट केल्याचा आरोप केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व्हिलन असल्याचं बॅनर्जींनी म्हटलं. ममता बॅनर्जींनी सत्यशोधन समिती स्थापन करणार असल्याचं म्हटलं, सत्यशोधन समिती 10 सदस्यांची असेल, त्यात 5 खासदारांचा समावेश असेल, असं म्हटलं. सत्यशोधन समितीचे सदस्य ज्या भागात अत्याचार झाला तिथं जाईल, असं बॅनर्जी यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयावर ताबा मिळवण्याचा काल प्रयत्न झाला. अभिषेक बॅनर्जींच्या कार्यालयावर काल दगडफेक करण्यात आली, तुम्ही अशा प्रकारे त्रास देऊ शकत नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाला. 

तुम्ही लोकांना अशा प्रकारे त्रास देत असाल तर कृपया समजून घ्या तुम्ही जेव्हा केंद्रात सत्तेत नसाल तेव्हा तुम्हाला अशाच लढाईचा सामना करावा लागेल, इतिहासाची पुनरावृत्ती होईल. पश्चिम बंगालमध्ये जे घडलं तो काळा इतिहास आहे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?
विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Rishabh Pant : रिषभ पंतनं लखनौचं कर्णधारपद सोडलं, LSG चा कॅप्टन कोण होणार? टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
रिषभ पंतनं आयपीएल संपण्यापूर्वी लखनौचं कर्णधार पद सोडलं, नवा कर्णधार कोण? भारताच्या माजी खेळाडूनं तीन नावं सुचवली
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
RBI Repo Rate : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Embed widget