एक्स्प्लोर

MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं

Worli Vidhan Sabha constituency: वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे Vs संदीप देशपांडे Vs मिलिंद देवरा अशी तिरंगी लढत आहे.

मुंबई: विधानसभा निवडणुकीत राज्यातील हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक असलेल्या वरळीत सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. या मतदारसंघातून शिंदे गटाने राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना रिंगणात उतरवले आहे. याच मिलिंद देवरा यांच्यावर मनसेच्या (MNS) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी बुधवारी झालेल्या सभेत जोरदार टीका केली. यावेळी संदीप देशपांडे यांनी मराठी कार्ड बाहेर काढत मिलिंद देवरा यांना लक्ष्य केले. 

मिलिंद देवरा यांना आजवर निवडणूक लढताना वरळीत (Worli Vidhan Sabha constituency) कधीच लीड मिळाले नाही. मिलिं देवरा हे मतदारसंघात सध्या भांडी वाटत आहेत. मात्र, यांनाच वरळीकर भांडी घासायला लावतील. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा म्हणाले होते की, मुंबई तुमची भांडी घासा आमची. यांना तुम्ही निवडून देणार का?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना संदीप देशपांडे यांनी 'मराठी कार्ड' बाहेर काढत स्थानिकांना साद घातली आहे. यावर आता मिलिंद देवरा हे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

संदीप देशपांडेंची ठाकरे गटावर जोरदार टीका

महाविकास आघाडीने वरळी विधानसभा मतदारसंघात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना प्रचारासाठी आणले होते. वरळीत तेलुगु मतदारांची संख्या मोठी आहे. त्यांना साद घालण्यासाठी मविआने रेवंत रेड्डी यांच्याकडून वरळीत प्रचार करुन घेतला. या मुद्द्यावरुन संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, वरळीत तेलंगणाचे मुख्यमंत्री प्रचाराला आले होते, काय झालं फाटली का ? एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरेंना बाहेरच्या राज्यात भाषणासाठी बोलवलं जायचे. आज परिस्थिती अशी आहे की, ठाकरे गटाला तेलंगणातून एखाद्या नेत्याला प्रचारासाठी बोलवावं लागत आहे. आधी यांनी 'केम छो वरळी' लिहिले, आता तेलगू मतदारांच्या मागे लागले आहेत, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले. 

आदित्य ठाकरे वरळीत मुस्लीम मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. जेव्हा गरज संपेल तेव्हा आदित्य ठाकरे यांनाही बाजूला करतील. यांना कोणाबद्दलही प्रेम नाही, यांना फक्त यांच्या कुटुंबाबद्दल प्रेम आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. 

बीडीडी चाळीच्या उंच इमारतींचा मेंटेनन्स मराठी माणसाला कसा परवडणार?

वरळीतील बीडीडी चाळीच्या इमारती 22 मजल्यांवरुन 40 मजल्यांच्या कशा झाल्या? हा निर्णय घेताना लोकांना विश्वासात घेण्यात आले नाही. सर्वसामान्य रहिवाशांना या इमारतींच्या मेंटेनन्स परवडेल का ? मराठी माणूस चाळीत राहतोय, त्याला कायमचा हद्दपार करण्याचे षडयंत्र आहे. या गोष्टींसाठी आपण यांना निवडून देणार आहात का ?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा

राज ठाकरेंचं वरळीत सर्वात आक्रमक भाषण, पुतण्या आदित्य ठाकरेंवर काय बोलले?

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget