एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर, सणसुद असल्यानं तारीख जाहीर नाही; निवडणूक आयोगाची माहिती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य केंद्रीय निवडणूक आयोगानं केलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : लोकसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकांनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत, जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं कोणतीही घोषणा केली नाही. 2019 ला हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका एकत्रच पार पडल्या होत्या. अशातच यंदाही दोन्ही राज्यांतील निवडणुका एकत्रच पार पडणार, असं बोललं जात होतं. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणातील निवडणुकांची घोषणा केली, पण महाराष्ट्रातील निवडणुका कधी? त्या लांबणीवर पडल्यात का? असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत राजीव कुमार यांना दोनवेळा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी यंदा हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्र का नाहीत? यावर मौन सोडलं. महाराष्ट्रात दिवाळीनंतर विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच, गणेशोत्सव, दिवाळी आणि पितृपक्ष असल्यानं अजून तारीख जाहीर झालेली नाही, असंही निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हटलं? 

महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील विधानसभेची निवडणूक 2019 मध्ये सोबत जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी निवडणूक आयोगासमोर जम्मू काश्मीच्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकांचा विषय निवडणूक आयोगासमोर होता. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आयोजित करायची आहे. सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त याचा विचार करता हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक सोबत जाहीर करत आहोत. 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला असता तिथं पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची कामं पूर्ण झालेली नाहीत.अनेक सण आहेत हा देखील मुद्दा असून गणेशोत्सव,पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत जाहीर करण्याचा घेण्याचा निर्णय घेतला, असं राजीव कुमार म्हणाले.

जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर 

  • जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 40 मतदारसंघात मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.  
  • हरियाणातील 90 जागांसाठी एका टप्प्यात मतदान पार पडेल. मतदान  1  ऑक्टोबरला होईल. तर, मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. हरियाणात सध्या भाजपचं सरकार आहे. तिथं काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget