एक्स्प्लोर

लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि आता व्होट जिहाद; जाणून घ्या, निवडणुकीपूर्वी 'या' मुद्द्यावर जोरदार चर्चा का होतेय?

What Is Vote Jihad? आता इंडिया आघाडीनं मुस्लिमांना मत जिहाद करण्यास सांगितलं आहे. आपण सर्वांनी पूर्वी लव्ह जिहाद ऐकलं होतं, लँड जिहाद ऐकलं होतं आणि आता व्होट जिहाद हा शब्द चर्चेत आला आहे.

What Is Vote Jihad? 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात दलीत, मराठा आणि मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aaghadi) मतांचा पाऊस पाडला. यामुळे भाजपला (BJP) मात्र मोठा फटका बसला. लोकसभेत बसलेल्या या फटक्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं (Shiv Sena Shinde Group) विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) लँड जिहाद (Land Jihad) आणि वोट जिहादचा (Vote Jihad) मुद्दा उचलून धरला आहे. आता निवडणुकांच्या धामधुमीत सातत्यानं महायुतीकडून (Mahayuti) केल्या जाणाऱ्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? खरंच मुंबईत लँड आणि वोट जिहाद सारखी प्रकरण होत आहेत का? की हे फक्त आरोपच आहेत... जाणून घेऊयात सविस्तर... 

आता इंडिया आघाडीनं मुस्लिमांना मत जिहाद करण्यास सांगितलं आहे. आपण सर्वांनी पूर्वी लव्ह जिहाद ऐकलं होतं, लँड जिहाद ऐकलं होतं आणि आता व्होट जिहाद हा शब्द चर्चेत आला आहे. यामध्ये धार्मिक नेते ध्रुवीकरण करून मतं मागतील, त्यालाच व्होट जिहाद म्हणतात, असं एकंदरीत बोललं जात आहे. निवडणुकाजवळ आल्या की, एखादा विशिष्ट समुदाय आपल्या समाजातील लोकांसोबत बैठक घेतो आणि त्या बैठकीत कुणाला मतदान करायचं ते ठरवतात. आश्चर्याची बाब म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत एखादा विशिष्ट समुदाय उघडपणे धमकावला जातो किंवा एखाद्या समुदायाला भडकावलं जातं किंवा दिशाभूल केली जाते. 

सध्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. देशात गेल्या 10 वर्षांपासून मोदी सरकार आहे, कोणत्याही मुस्लिम समाजातील व्यक्तीला हानी पोहोचली आहे का? तरीसुद्धा भाजपवर सातत्यानं आरोप केले जात आहेत, ते आरोप करण्यात माहीर आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मराठा, दलित आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन महायुतीला मतदान केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की, भाजपचा दारुण पराभव झाला. या पराभवातून धडा घेत भाजपनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लँड जिहाद आणि वोट जिहादचा मुद्दा उपस्थित केला. त्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही भाजपच्या साथीनं विरोधकांवर निशाणा साधत आहे.

महाराष्ट्रातील काही भागांत मुस्लिमांची लोकसंख्या खरोखरच वाढली आहे का? लोकसंख्या वाढीमुळे मतांवर परिणाम होतोय का?  महाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चुरस चांगलीच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

जाणून घेऊयात... लोकांचं नेमकं म्हणणं काय? 

नुकत्याच खासदारांच्या निवडणुका झाल्या आणि एकूणच महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर एका विशिष्ट समाजाला धमकावल्याचं किंवा भडकावलेलं, दिशाभूल झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. भाजप आल्यास चुकीचं ठरेल, असं त्यांना सांगितलं जातंय. हा हिंदुत्वाचा पक्ष आहे. हे आलं तर तुमचा काही फायदा होणार नाही, त्यामुळे मला त्या लोकांना संदेश द्यायचा आहे की, जर रस्ते विकास होत असेल. शाळांचा विकास झाला, तर तिथे हिंदू मुलं आणि मुस्लिम मुलंही येतील. दोघांनाही एकाच प्रकारचं शिक्षण मिळेल, असं एका व्यक्तीनं म्हटलं आहे. 

भारतातील प्रत्येक नागरिक मतदान करण्यास तयार आहे, पण बाहेरच्या लोकांमुळे मताची फेरफार केली जात आहे. बाहेरून आलेल्या लोकांना मतदानाचा हक्क मिळत आहे. हे कसं शक्य आहे? आम्ही जिहाद हा शब्द वापरत आहोत, कारण तो एका विशिष्ट मुस्लिम धर्माशी जोडला जात आहे. हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की, जो पक्ष विकास करत आहे, त्या पक्षाविरुद्ध विशिष्ट धर्म भडकावला जात आहे.

आणखी एकानं बोलताना सांगितलं की, इथे 8 कोटींहून अधिक बांगलादेशी त्यांच्या देशात दाखल झाले आहेत. गांधी परिवार, शरद पवार यांचं सरकार आणि काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं त्यांना मदत केली आहे. त्यांना मतदान करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. आज बांगलादेशात आपल्या हिंदू बांधवांचं काय चाललं आहे? आपलं सरकार तिथे बसून काय करतंय? आपल्या हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहेत. एका बाजूनं देशाला कमकुवत करण्याचं काम केलं जात आहे. देश कमकुवत न होता मजबूत झाला पाहिजे.

हिंदुस्थान वक्फ बोर्डानं 1947 नंतर अशा तरतुदी केल्या आहेत, ज्याचा परिणाम काँग्रेस सरकारच्या काळात दिसून आला. तुम्हाला आठवत असेल की, एकदा काही तहसीलदार इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये झाडे लावण्यासाठी गेले होते आणि त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. इथे तुम्ही झाडे कशी लावता, ही वक्फ बोर्डाची जमीन आहे, असं त्यांना सांगण्यात येत असल्याचे स्पष्टपणं दिसत होतं. आज लँड जिहाद हा एक मोठा मुद्दा आहे, असं एका व्यक्तीनं बोलताना सांगितलं

तुम्ही काही दिवसांपूर्वीच अबू आझमी यांचं भाषण ऐकलं असेल. ते म्हणालेले की, मुकेश अंबानी यांची अँटिलिया बिल्डिंग ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. याचा अर्थ एवढ्या मोठ्या माणसाची इमारत त्यांना ताब्यात घ्यायची आहे. वक्फकडे हजारो-लाखो एकर जमीन आहे. आज लँड जिहादमुळे देशभरात, महाराष्ट्रात, सर्व सरकारी जमिनींवर एकतर बांगलादेशी राहत आहेत किंवा कोणीतरी त्यांना वसवण्याचं काम करत आहे.

लँड जिहादच्या नावाखाली एवढा मोठा धंदा सुरू आहे. भारत हा गुलिस्तान आहे आणि तो गुलिस्तानच राहू द्यायला हवा. माझं एकच आवाहन आहे की हिंदू, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन हे आपसात भाऊ आहेत आणि बंधुतेचा नारा नेहमी जिवंत ठेवा, जसा आपल्या गांधीजींनी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी जिवंत ठेवला होता.

दरम्यान, व्होट जिहादच्या मुद्द्यावरून मुंबईतील लोकांमध्ये फूट पडली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र आहेत. महायुती आणि भाजपच्या समर्थकांनी लँड आणि व्होट जिहादच्या मुद्द्यावर आपापल्या नेत्यांचं समर्थन केलंय तर मविआच्या समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एकंदरीत पाहता, या प्रकरणाबाबत राज्यातील जनतेच्या प्रतिक्रियाही संमिश्र आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Embed widget