एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : 2014, 2019 ला माझा शिवसैनिक हारुन खान नरेंद्र मोदींसाठी मतं मागत होता, उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांना दाखला

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये कैलास पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

धाराशिव : उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये सभा घेतली.  ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचा अभिमान आहे, असं त्यांनी म्हटलं. कैलास पाटील यांना घेऊन चालले होते पण तो माझ्या संपर्कात होता. कैलास कसा आला, का आला ते त्यानं सांगितलेलं आहे.  निष्ठा कधी विकली जाऊ शकत नाही, निष्ठा कोण विकत घेऊ शकत नाही,असं ठाकरेंनी म्हटलं.  मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हारुन खान यांच्या उमेदवारीवरुन भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. 

भाजपचा मला संपवायचा प्रयत्न आज देखील सुरु आहे. तुम्ही सोबत आहात तोपर्यंत माझं अस्तित्व आहे. मोदी शाह मला संपवू शकत नाहीत. माझं संरक्षण कवच आई जगदेंबनं तुमच्या रुपात दिलेलं आहे. आपण आपला वचननामा दिलेला आहे, मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय. महायुतीचा जुमलानामा प्रसिद्ध झालाय. महिलांना 1500 रुपये देत आहेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणतात. पण हे कधी तुम्ही लोकसभेला पेकाटात लाथ घातली तेव्हा केलं. माझं सरकार पाडलं तेव्हा का केलं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझं सरकार आलं तेव्हा सात जण मंत्री  होतो, अजित पवार मंत्रिमंडळात नव्हते, त्यावेळी आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

नरेंद्र मोदी म्हणाले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु पण किती शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सोयाबीन शेतकऱ्यांना आमच्या सरकारच्या काळात जास्त भाव मिळत होता. गद्दारांना 50 खोके देताना लाज वाटत नाही पण राबराबणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोन्याची किंमत मातीमोल करता, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. आपलं सरकार आल्यानंतर तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची कर्जमाफी करणार आहोत.  शेतमालाला हमीभाव देणार आहोत, असं ठाकरेंनी म्हटलं. 

तेव्हा तुम्हाला धर्मयुद्ध का आठवलं नाही : उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल वर्सोवा आणि अंधेरीत सभा घेतली.वर्सोवा मतदारसंघात हारुन खान या शिवसैनिकाला उमेदवारी दिलीय. 25-30 वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करतोय. त्याच्या पत्नी नगरसेवक होत्या. त्याला पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस तिकडे गेले आणि धर्मयुद्ध करा म्हणाले.  देवेंद्र फडणवीस विसरले असतील, 2014 आणि 2019 ला आम्ही तुमच्यासोबत होतो, मोदींसाठी मत मागत होतो तेव्हा माझा शिवसैनिक नरेंद्र मोदींसाठी मत मागत होता तेव्हा तुम्हाला धर्मयुद्ध का दिसलं नाही,असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.  

इतर बातम्या : 

अंतरवाली सराटीत लाठीचार्ज कुणाच्या आदेशानं झाला? आया बहिणींची डोकी कुणी फोडली?, कैलास पाटलांचा सवाल

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget