एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक निकाल : 'माझा'च्या खास डायरीतून निकालाबाबत दिग्गजांचे एक्सक्लुझिव्ह अंदाज

एबीपी माझ्या विशेष 'डायरी'मध्ये देखील महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे अंदाज आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे. यातली काही नेत्यांनी आपल्याच पक्षाला मोठा आकडा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर अनेकांनी तटस्थपणे आपला अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे वेगवेगळे अंदाज आले आहेत. एक्झिट पोलचे अंदाज आणि वेगवेगळ्या ज्योतिषांचे तसेच राजकीय विश्लेषकांचे अंदाज समोर आले आहेत. यामधील बहुतांश पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार असण्याचा अंदाज आहे. यातच एबीपी माझ्या विशेष 'डायरी'मध्ये देखील महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे अंदाज आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांचा समावेश आहे. यातली काही नेत्यांनी आपल्याच पक्षाला मोठा आकडा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर अनेकांनी तटस्थपणे आपला अंदाज व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते भाजपला 36 ते 42 जागा मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 36 ते 42 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 6  ते 12 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी 8 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. दानवे म्हणतात भाजप-शिवसेनेला 45 जागा मिळणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे एनडीएच्या बाबतीत अधिक आशावादी आहेत. त्यांच्या अंदाजानुसार शिवसेना-भाजपला 45 तर काँग्रेस राष्ट्रवादीला केवळ तीनच जागा मिळणार आहेत. 30  मार्च 2019 रोजी त्यांनी आपला अंदाज एबीपी माझाच्या डायरीत नोंद केला होता. सुधीर मुनगंटीवारांच्या मते एनडीएला 35 ते 38 जागा मिळणार  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 35 ते 38 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 10  ते 13 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी 13 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. संकटमोटक गिरीश महाजनांच्या मते शिवसेना-भाजपला 40 जागा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 40 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 8 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी 13 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. पंकजा मुंडेंच्या मते शिवसेना-भाजपला 36 ते 42 जागा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मतेमहाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 36 ते 42 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 6 ते 12 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जागा भाजप शिवसेनेला मिळतील, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी 22 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. विनोद तावडेंच्या मते शिवसेना-भाजपला 35 ते 39 जागा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 35 ते 39 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 9  ते 13 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी 26 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. संजय राऊत यांच्या मते शिवसेना-भाजपला 25 ते 32 जागा शिवसेनेचे नेते संजय राऊत  यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 25 ते 32 जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस राष्ट्रवादीला 15  ते 22 जागा मिळणार असल्याचा त्यांचा अंदाज आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे देखील विजयी होतील, असाही त्यांचा दावा आहे. त्यांनी 22 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. महाराष्ट्रात आताच्या घडीला अंदाज देणे अवघड : अजित पवार महाराष्ट्रात आताच्या घडीला अंदाज देणे अवघड आहे. अजून काही वेळ मिळाला पाहिजे. अजूनही लोक नक्की काय मनात आहे हे सांगत नाहीत, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.  त्यांनी 12 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपलं हे मत नोंद केलं होतं. सुप्रिया सुळेंच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 18 जागा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 18 जागा मिळणार आहेत. त्यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 30 जागा मिळणार आहेत. त्यांनी 10 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. प्रफुल्ल पटेलांच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 25 जागा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 25 जागा मिळणार आहेत. त्यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 23 जागा मिळणार आहेत. त्यांनी 19 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. धनंजय मुंडे यांच्या मते 50-50 जागा  राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 50-50 जागा युती आणि आघाडीला दिल्या आहेत. त्यांच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला 23 ते 25 जागा मिळणार आहेत. तसेच भाजप आणि शिवसेनेला 23 ते 25 जागा मिळणार आहेत. त्यांनी 19 मार्च 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. जानकरांच्या मते राष्ट्रवादी-काँग्रेसला केवळ 5 जागा  दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला केवळ 5 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे.  त्यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 42 जागा मिळणार आहेत. त्यांनी 24 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. काँग्रेस नेते राजीव सातवांच्या मते काँग्रेस-राष्ट्रवादीला 20 जागा काँग्रेस नेते राजीव सातवांच्या मते काँग्रेस-राष्ट्रवादीला 20 जागा मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेला 28 जागा मिळणार आहेत. त्यांनी 25 एप्रिल 2019 रोजी एबीपी माझाच्या डायरीत आपला अंदाज नोंद केला होता. एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसणार असल्याचं दिसतं आहे. एबीपी-नेल्सनप्रमाणेच इतर संस्थांच्या एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. एनडीएला 277 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापैकी एकट्या भाजपच्या वाट्याला 227 जागा येणार असल्याचं भाकित पोलमध्ये वर्तवण्यात आलं आहे. तर यूपीएला 130च्या दरम्यान जागा मिळणार असल्याचं पोलची आकडेवारी सांगते. या पोलनुसार लोकसभा 2019 च्या निकालात एनडीएला 277, यूपीए 130, इतरांना 135 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या एक्झिट पोलमध्ये 543 लोकसभा मतदारसंघांपैकी 542 मतदारसंघांचा अंदाज सांगितला आहे. तामिळनाडूच्या एका जागेवर निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केली होती. लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक आहेत. मात्र अंतिम निकाल येण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता आहे. व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप मोजणीसाठी हा अतिरिक्त वेळ लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी रात्री दोन वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जय-पराजयाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. देशभरातील 543 पैकी 542 मतदारसंघाच्या मतमोजणीला 23 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतरच कल हाती येण्यात सुरुवात होईल. त्यानंतर कोणता पक्ष जिंकणार, कोणता पक्ष सरकार स्थापन करणार हे स्पष्ट होईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमरावती विधानपरिषद निवडणूक! भाजपकडून प्रवीण पोटेंच्या नावावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज
अमरावती विधानपरिषद निवडणूक! भाजपकडून प्रवीण पोटेंच्या नावावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज
Nanded Politics : हॉटेलमध्ये मध्यरात्री भेट; श्रीकांत शिंदे अन् चिखलीकरांच्या 'त्या' गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
हॉटेलमध्ये मध्यरात्री भेट; श्रीकांत शिंदे अन् चिखलीकरांच्या 'त्या' गुप्त बैठकीमुळे नांदेडच्या राजकारणात भुवया उंचावल्या, नेमकं काय घडलं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 40 उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय? 
Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
सोलापूर विधान परिषदेला धक्कादायक ट्विस्ट! 'या' 3 महिला नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
Embed widget