एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश, प्रवेशानंतर म्हणतात...
मी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन पाहिलं नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर अजून हर्ष दिसेल कारण आता तुमच्याकडे हर्षवर्धन आलेला आहे.
![हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश, प्रवेशानंतर म्हणतात... Congress Leader Harshvardhan Patil enter in BJP हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश, प्रवेशानंतर म्हणतात...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/11162705/web-Harshvardhan-patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजप प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आमचा समाज अन्यायग्रस्त समाज आहे. अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ताकद द्यावी. मी कुठलीही अट घालून भाजपात आलेलो नाही, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कधीच टेन्शन पाहिलं नाही. आता त्यांच्या चेहऱ्यावर अजून हर्ष दिसेल कारण आता तुमच्याकडे हर्षवर्धन आलेला आहे.
माझ्या मतदारसंघाची भौगालिक परिस्थिती माहिती आहे. मित्र आणि शत्रू बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही. तुमच्या मनात आलं तर आमच्या जिल्ह्यात धो धो पाणी येईल, असेही ते म्हणाले. यावेळी भाषणादरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्ते वगळून सर्वांचा उल्लेख केला. त्यामुळे एका भाजप कार्यकर्त्याने भाषणामध्येच त्यांना 'आम्ही ही आलोय' याची आठवण करून दिली. त्यावेळेस हर्षवर्धन पाटलांनी 'आता मीच भाजपात आलोय. यांना विश्वासच पटेना की मी आलोय' असे म्हणताच एकच हशा पिकला.
त्यावेळेस हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत असते तर सुप्रियाताईंनाही घरी पाठवलं असतं - चंद्रकांत पाटील
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेच्या दोन दिवस आधी हा निर्णय घेतला असता तर बारामती बाबतचा संकल्प पूर्ण झाला असता आणि ते खासदार झाले असते. आम्ही ठरवलं होतं माढा, पवारांना पाडा. मात्र पवारांनी वेळीच माघार घेतली. मात्र त्यावेळेस हर्षवर्धन पाटील आमच्यासोबत असते तर सुप्रियाताईंनाही घरी पाठवलं असतं, असे ते म्हणाले. मात्र ते हुशार राजकारणी आहेत, लोकसभेचा निकाल लागल्यावर बघू असं त्यांनी तेव्हा ठरवलं होतं. नाहीतर ते तेव्हाच भाजपात आले असते. युतीचेच सरकार येणार असून ते मोठ्या बहुमताने येणार आहे. आधी घोषणा केली होती की अब की बार 220 पार, आता ही घोषणा मागे पडली असून आता यापेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. हर्षवर्धन यांना आश्वस्त करतो की त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही ते म्हणाले.
या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबत हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील, पुत्र राज्यवर्धन पाटील आणि त्यांचे कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion