एक्स्प्लोर

Video: राहुल गांधींनी डान्स केला, नदीत उड्या टाकून बघितल्या पण..; बिहार विजयानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Bihar vidhansabha Result अतिशय मनापासून बिहारच्या जनतेचं आभार मानतो. बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिलेलं आहे.

मुंबई : बिहारमध्ये (Bihar) भाजप एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं असून बिहार विधानसभेत आता एनडी आघाडीची सत्ता येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बिहारच्या निकालानंतर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून नेतेमंडळीही विजयावर प्रतिक्रिया देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनीही बिहार विजयावर आनंद व्यक्त केला. त्यानंतर,आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय, असेही मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं. 

अतिशय मनापासून बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो, आभार मानतो. बिहारच्या जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमारांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिलेलं आहे. जे आकडे दिसत आहेत, त्यावरुन 2010 चा रेकॉर्ड तुटेल असा हा विजय झालेला आहे. मोदींवर बिहारच्या जनतेचं असलेलं प्रेम आपल्याला दिसून येतंय, नितीश कुमार, चिराग पासवान असतील मांझी असतील, उपेंद्र कुशवाह यांच्यासह युतीला लोकांनी प्रतिसाद दिला.  

राहुल गांधींवर बोचरी टीका (Critics on rahul gandhi)

काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार सुरू केलाय, त्याला जनतेनं उत्तर दिलंय.संवैधानिक संस्थांवर आरोप करणे, संवैधानिक मार्गाने चालणाऱ्या कारभाराला विरोध करणे, जनतेच्या मताधिक्याला विरोध करणे. जोपर्यंत राहुल गांधी अशाप्रकारे संवैधानिक संस्थांवर आरोप करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत अशीच राहिल. काँग्रेसची हालत एमआयएमपेक्षाही खाली गेलीय, बिहारच्या इतिहासातील काँग्रेसचा सर्वात कमी स्कोअर आहे. राहुल गांधींनी व्होट चोरीचा मुद्दा काढला, त्यावर यात्रा काढली, नदीत उड्या टाकून बघितल्या, डान्स करुन बघितला. पण, लोकांचा विश्वास हा मोदीजी आणि नितीशकुमार यांच्यावर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाला आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे. 

बिहार निवडणुकीत सगळे मुद्दे बाजुला पडले आहेत, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला. मोदीजी आणि नितीश कुमार यांचा चेहरा हाच प्रमुख मुद्दा ठरल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावेळी, प्रोइन्कम्बन्सी दिसली, मागच्यावर्षी एन्टीइन्कम्बन्सी होती. त्यामुळे, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 160 जागा जिंकू असं वाटत होतं, आम्ही त्याहीपेक्षा मोठा विजय मिळाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.      

बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? (Bihar vidhansabha election)

नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये निवडणुका झाल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, आमच्या पक्षाचे प्रमुख आणि नितीशकुमार हे एकत्र बसून घेतील. मुख्यमंत्री पदासंदर्भातील बोलण्याचा अधिकार मला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. वेळोवेळी अमित शाह यांनी अतिशय स्पष्टपणे त्यासंदर्भात भूमिका मांडली आहे. आमच्या संसदीय समितीचा आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा तो निर्णय होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.  

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
Jalgaon Vidhan Parishad Election 2026: गुलाबराव पाटलांची मुलाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी मुंबईत फिल्डिंग; गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले, 'मी देखील तातडीने...'
गुलाबराव पाटलांची मुलाच्या विधानपरिषद उमेदवारीसाठी मुंबईत फिल्डिंग; गिरीश महाजनांनी डिवचलं; म्हणाले, 'मी देखील तातडीने...'
Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल
अमरावतीत राणा दाम्पत्याचा नवा 'प्लॅन'! विधान परिषदेच्या रिंगणात बड्या उद्योजकाची उडी; राणांच्या कार्यकर्त्यांची पोस्ट व्हायरल

व्हिडीओ

Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
Embed widget