एक्स्प्लोर

RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक

Ulema board letter to MVA: विविध दंगलींमध्ये आरोपी बनवण्यात आलेल्या मुस्लिम धर्मीय आरोपींची कायेदशीर सुटका करावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

नागपूर: उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पाठवलेल्या एका पत्रामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. या पत्रावरुन विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) आक्रमक भूमिका घेतली आहे. उलेमा बोर्डाने (Ulema board) मविआला पाठवलेल्या पत्राबाबत विहिंपने (VHP) काँग्रेस पक्षाबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. या पत्रात उलेमा बोर्डाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालावी, अशी मागणी मविआकडे (Mahavikas Aghadi) केली आहे. यावर विहिंपने म्हटले आहे की,  संघावर बंदी लादणे ही स्वप्नवत (स्वप्नाची) गोष्ट, तशी प्रत्यक्ष कृती शक्य नाही. कोणी संघावर बंदी लादण्याची स्वप्ने पाहू नये. भूमाफिया वक्फ बोर्डाला निधीची काय गरज, असा सवाल विहिंपकडून उपस्थित करण्यात आला. तसेच पोलीस दलात मुस्लिम तरुणांना प्राधान्य द्यावे, या उलेमा बोर्डाच्या मागणीचाही विहिंपकडून तीव्र विरोध करण्यात आला.  

संघावर बंदी लादणे ही स्वप्नवत (स्वप्नाची) गोष्ट आहे, त्याची प्रत्यक्ष कृती आता होऊ शकत नाही. संघावर बंदी लादण्याचे स्वप्न नेहरू पासून अनेकांनी पाहिले.. तसे प्रयत्न इंदिरा गांधींनी ही केले.. संघ मात्र, आता त्या प्रयत्नापेक्षा मोठा झाला आहे. त्यामुळे कोणी ही संघावर बंदी लादण्याची स्वप्ने पाहू नये असे मत विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केले. ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 17 वेगवेगळ्या मागण्या करत संघावर बंदी लागण्याची ही मागणी केली होती.. त्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

हिंदू समाज तुम्हाला सोडणार नाही, विहिंपचा मविआला इशारा

वक्फ बोर्ड देशातील सर्वात मोठा भूमाफिया असून अशा भूमाफिया संघटनेला 1 हजार कोटी रुपयांचा निधी अनुदानामध्ये देण्याची उलेमा बोर्डाने मागणी करणे चूक आहे. उलेमा बोर्डाने अशी मागणी करणेच मुळात खूप मोठे धाडस असून आता इतर धर्मियांनी त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे गोविंद शेंडे म्हणाले.

2012 ते 2024 दरम्यान राज्यातील विविध दंगलींमध्ये आरोपी बनवण्यात आलेल्या मुस्लिम धर्मीय आरोपींची कायदेशीर प्रक्रियेतून सुटका करावी अशी मागणी ही उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीकडे केली होती. त्यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही दंगल कराल, संपत्तीची जाळपोळ कराल, सरकारची संपत्ती नष्ट कराल आणि हे केल्यानंतर कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास, कारवाई झाल्यास ती कायदेशीर कारवाई मागे घेण्याची मागणी करणे अत्यंत चुकीचे असल्याचे विहिपचे म्हणणे आहे. 

देशात कायदा, न्यायालय काही शिल्लक राहिला आहे की नाही? कोणी चुकीचे काम करणार असेल, तर त्याचे परिणाम तर भोगावेच लागणार. त्यामुळे उलेमा बोर्डाच्या चुकीच्या मागण्यांबद्दल नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विचार करण्याचे आश्वासन देणे अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे विहिंपचे म्हणणे आहे. काही मतांसाठी मुस्लिमांची किती चापलुसी करणार. हिंदू समाज आता तुम्हाला सोडणार नाही असे गोविंद शेंडे म्हणाले.

पोलीस भरतीमध्ये मुस्लिमांच्या भरतीला विहिंपचा विरोध

मुस्लिम तरुणांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य द्या, या उलेमा बोर्डाच्या मागणीचाही विहिंप ने कडाडून विरोध केला आहे. धार्मिक आधारावर देशात कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे आधीच स्पष्ट केले आहे. असे असताना महाविकास आघाडीचे नेते आरक्षणाची मर्यादा 50% च्या वर नेण्याची जी भाषा करत आहे, त्यामागे महाविकास आघाडीच्या मनात मुस्लिमांना आरक्षण देण्याची योजना तर नाही अशी शंका आम्हाला असल्याचेही शेंडे म्हणाले.

नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एक तर उलेमा बोर्डाने केलेल्या मागण्यांचा उघड समर्थन करावे. अन्यथा धाडस करून उलेमा बोर्डाच्या चुकीच्या मागण्या पूर्णपणे फेटाळून लावाव्या आणि प्रचार सभांच्या माध्यमातून ते जाहीर करून हिंदू समाजाला आश्वस्त करावे, अशी मागणी ही विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

आणखी वाचा

हिंदुत्ववादी पंतप्रधान शिवाजी पार्कवर येताय अन्...; राज ठाकरे आक्रमक, उद्धव ठाकरे, राहुल गांधींवरही हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन, जळगावच्या निकालावर महाजन थेटच बोलले..
Eknath Khadse on BJP : रक्षा खडसे एकट्या पडल्या, त्यामुळे मी शेवटचे दोन दिवस मैदानात उतरलो
Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?
Rajan Salvi on Dharashiv : निंबाळकर,कैलास पाटलांना मोठा धक्का,ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरघोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Embed widget