एक्स्प्लोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात ताकदवान नेते बनले, कारण...

2014 विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गर्दीतला एक चेहरा होते. मात्र त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दाखवलेलं नेतृत्व त्यांना आज ताकदवान नेता म्हणून समोर आणत आहे.

मुंबई : सध्या राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांवर नजर टाकली तर, मुख्यमंत्री सर्वात ताकदवान नेते म्हणून दिसत आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील आगामी मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही निवडणुकांवर नजर टाकल्यास भाजपने पहिल्यांदा आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलाय. 2014 विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गर्दीतला एक चेहरा होते. मात्र त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दाखवलेलं नेतृत्व त्यांना आज ताकदवान नेता म्हणून समोर आणत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात असं काय केलं की त्यांना ताकदवान नेता म्हणून पाहिलं जात आहे.

मित्रपक्ष शिवसेनेला लगाम घातला

देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी शिवसेना सरकारमध्ये सहभागी नव्हती, तर भाजपकडेही बहुमत नव्हतं. भाजपकडे 122 जागा होत्या. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीने विश्वास ठरावावर बहिष्कार टाकून फडणवीस सरकार वाचवलं होतं. त्यानंतर भाजपने शिवसेनेलाही सरकारमध्ये सामिल करुन घेतलं. मात्र सरकारमध्ये असूनही शिवसेना सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेताना दिसली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सरकारवर सतत हल्लाबोल केला जात होता. शिवसेनेच्या मंत्र्यांनी तर राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याची धमकी अनेकदा सरकारला दिली. शिवसेनेची सरकारविरोधी भूमिका असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष राज्यातील सरकार चालवून दाखवलं. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली आणि राज्यात शिवसेनेची विधानसभेला 50-50 टक्के जागांनी मागणी असतानाही त्यांना 124 जागांवर रोखलं. तर भाजप आणि मित्रपक्षांनी युतीत 164 जागा मिळवल्या. याशिवाय मित्रपक्षाचे सर्वच उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मित्र पक्षांना भाजपने जारी केलेलं व्हीपचं पालन करावच लागणार आहे.

विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांचं पक्षांतर

राज्यात आज विरोधी पक्षाची स्थिती पाहिली तर विरोधी पक्ष नाहीत जमा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील देखील भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. राज्यातील विरोधी पक्षाला खिंडार पाडण्याचं मोठं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं.

भाजपमधील अंतर्गत विरोध संपवला

2014 मध्ये भाजप मोठा पक्ष म्हणून समोर आला, त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु असताना अनेक मोठी नावं समोर होती. यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावं आघाडीवर होती. पुढे पकंजा मुंडे यांच नाव चिक्की घोटाळ्यात आलं, त्यामुळे त्या बॅकफुटवर गेल्या. मात्र त्यांना क्लिनचीट मिळाली. यंदाच्या निवडणुकीत तर मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा बाळगणारे विनोद तावडे, एकनाथ खडसे यांना तर पक्षाने तिकीटच दिलं नाही. या दोन नेत्यांना तिकीट मिळालं नाही यामध्ये मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

सरकार विरोधातील आंदोलने चातुर्याने शांत केली

मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ या मुद्द्यांवर विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चातुर्याने या सगळ्या मुद्द्यांवर विरोधकांना वेसण घातलं. लोकसभा निवडणुकीतील निकालावरुन हे स्पष्ट झालं की, या मुद्द्यांवरुन भाजप सरकारला काहीही फटका बसला नाही.

पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील यश

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षात राज्यातील महापालिका, नगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपने मोठं यश संपादित केलं. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने विरोधात उमेदवार दिला असतानाही भाजपने ही जागा जिंकली. नाशिक महानगरपालिकेमधील राज ठाकरे यांच्या मनसेची सत्ता उलथून लावली आणि त्याठिकाणी भाजपचा महापौर बसवला.

राजकारणातील देवेंद्र फडणवीस यांचा वेग पाहिला तर आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी असतील अशीही चर्चा आहे. मात्र यासाठी त्यांना भाजपमध्ये अमित शाह आणि योदी आदित्यनाथ यांचा मुकाबला करावा लागणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
मोठी बातमी! मुंबईसाठी भाजप महायुतीचं ठरलं, शिंदेंच्या शिवसेनेला 79 जागा; 20 जागांसाठी वेगळाच फॉर्म्युला
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Embed widget