एक्स्प्लोर

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

अमित शाह यांनी सांगलीतील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

जालना: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी आज प्रचाराचा शुभारंभ केला. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सभा घेत अमित शाहांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, शिराळा येथील सभेत बोलताना महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होईल, याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे, महायुतीमधील पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, तेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अमित शाहांच्या या वक्तव्यावरुन आता महायुतीमधील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या असून महाविकास आघाडीमधील नेतेही यावरुन भाजपसहं त्यांच्या मित्र पक्षांना टोला लगावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर आता शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जालन्यातील परतूर येथील सभेतून उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली. 

अमित शाह यांनी सांगलीतील सभेत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर, देवेंद्र फडणवीस हे भावी मुख्यमंत्री असल्याचे संकेत अमित शाह यांनी दिल्यानंतर मित्र पक्षाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच, विरोधी पक्षातील जयंत पाटील व उद्धव ठाकरेंनीही यावरुन टीका केल्याचं दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे संकेत केंद्रीय मंत्री अमित शाह वारंवार देत आहेत. याचा आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार विचार करतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले. या विधानसभेनंतर त्यांना कोणतीही संधी असणार नाही हेच अमित शाह सातत्याने सांगत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. माढा येथील सभेनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही घणाघातील टीका करत एकनाथ शिंदे व अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. 

तुम्ही लोकसभेत फटके दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिच शाह भाजपवाल्यांना मलम लावायला महाराष्ट्रात आले आहेत, तुमच्या इंजिनाला लागलेली भ्रष्टाचाराची चाकं यावेळी पंक्चर होणार आहेत. 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला, त्याला बाजूला घेऊन त्यांच्या प्रचाराला येत, कोणत्या तोंडाने मत मागता?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून केला आहे. तसेच, अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे संकेत दिले होते. त्यावरूनही, उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली.  आता मिंदे आणि अजित पवारांना भाजपवाले भांडी घासायला ठेवतात की नाही बघा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंची भाजपवर पलटवार केला आहे. 

अमित शाह नेमकं काय म्हणाले

20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले. 

हेही वाचा

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
Ajit Pawar : असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
Ajit Pawar : असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
Shaktipeeth Expressway : राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
Independence Day: स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर, पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी सुद्धा फॉर्म भरला; म्हणाले, अवयवदान इच्छा नोंदवणे जबाबदारी व्हायला हवी
अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर, पालकमंत्री प्रकाश आबिटकरांनी सुद्धा फॉर्म भरला; म्हणाले, अवयवदान इच्छा नोंदवणे जबाबदारी व्हायला हवी
Embed widget