एक्स्प्लोर

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाचा स्वबळावर स्वतंत्र लढण्याचा पवित्रा? अंबादास दानवे म्हणाले....  

येणाऱ्या निवडणुका मविआत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा ठाकरे गटाच्या काही पराभूत उमेदवारांचा सूर आहे. यावर आता अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया देत या मुद्यावर भाष्य केलंय.

Ambadas Danve मुंबई : येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा ठाकरे गटाच्या काही पराभूत उमेदवारांचा सूर आहे. उद्धव ठाकरे यांनी काल बोललेल्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीत ईव्हीएम गोंधळाच्या मुद्द्यासोबत  काही पराभूत उमेदवारांनी स्वतंत्र  निवडणूक लढवण्याचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडला. महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवून फारसा फायदा विधानसभा निवडणुकीत झाला नसल्याचे काही पराभूत उमेदवारांचं म्हणणं उद्धव ठाकरे यांच्या समोर त्यांनी मांडलं. मात्र यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही. पक्षप्रमुख आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपली प्रतिक्रिया देत या मुद्यावर भाष्य केलंय.

कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याच्या भावना- अंबादास दानवे

काही लोकांचा सुर आहे की आपण स्वतंत्र लढल पाहिजे. एक दोन नाही तर अनेकांनी मत व्यक्त केल कि शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे.  शिवसेनेला सत्ता हवीय असं नाही. मात्र कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी कोणाचीही गरज नाही एवढं त्यांच्या एका पक्षाला यश मिळाला आहे थोड्या बहुत उरलेल्या लोकांची ते तजवीज करू शकतात. तर महायुतीत . महायुतीत शिंदे कितीही नाराज असले तरी त्यांना भाजप समोर झुकावं लागेल. भाजप उठ म्हटले तर उठाव लागेल बस म्हटले तर बसावं लागेल. त्यांच्यावर अन्याय होत नाही आहे. भाजपने अनेक गोष्टी एकनाथ शिंदे यांना दिल्या आहे. महाराष्ट्र लुटायला दिला. चोरलेलं चिन्ह दिले.  सत्ता दिली. त्यामुळे आता भाजप मुख्यमंत्री पदाची भुमिका योग्य आहे. अशी प्रतिक्रिया देत अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.  

ईव्हीएमबाबत कुठं तरी पाणी मुरतय, बॅलेटवर मतदान व्हावं- अंबादास दानवे

आमच्या पराभूत उमेदवारांची बैठक झाली. जिंकलेल्या उमेदवारांच्या पण काही तक्रारी होत्या. अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मतांमध्ये देखील अनेक तफावत आढळून आली आहे. सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कुठेतरी पाणी मुरतय, हे स्पष्ट होतय. ईव्हीएम मध्ये पाणी मुरतय. बॅलेटवर मतदान व्हावं, अशी आता जनभावना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जनआंदोलन देशपातळीवर झालं  पाहिजे. निवडणूक आयोगाने कन्नडमध्ये जे केलं ते राज्यात अनेक ठिकाणी झालंय, या प्रकारांवर पारदर्शक पणे उत्तर द्यावे लागती, असेही अंबादास दानवे म्हणाले.   

एवढं बहुमत मिळालं तर तासभर ही लागायला पाहिजे नव्हता. डिक्लेर का होत नाही? काही नेतृत्वाविषयी शंका आहे का? मुख्यमंत्री पद दुस-याला द्यायची गरज काय? त्यांचे 133 आमदार आहे त्यांना 145 आमदार जमा करण हे फार अवघड नाही. काही ठिकाणी मत पेट्या उघड्या आल्या त्याबद्दल निवडणूक आयोगाने बोललं पाहिजे. असेही अंबादास दानवे म्हणाले.   

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget