एक्स्प्लोर

सगे सोयरेबाबत लक्ष घालून मार्ग काढू, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झालीय : अजित पवार

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नवी दिल्लीत माध्यमांसोबत बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं (Nationalist Congress Party) कॅबिनेट मंत्रिपदासाठी वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं. याशिवाय पुण्यातील पाऊस, मराठा आरक्षण, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार यसह इतर मुद्यांवर भाष्य केलं. 

सगेसोयरेच्या मुद्यावर अजित पवार काय म्हणाले?

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आमची एकत्रित चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने सगे सोयरे बाबत निर्णय घेण्याबाबत काय, कुणी बोलायचं हे आमचं ठरलं आहे. आम्ही लक्ष घालून मार्ग काढू, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी घेत आहेत. या सोहळ्यासाठी आम्ही सर्वजण आलो आहोत. आज आम्ही शपथविधीसाठी आलो आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मीटिंग झाली. काल रात्री आमच्या सोबत संपर्क करण्यात आला.  रात्री जे.पी. नड्डा, अमित शाह यांच्यासमवेत आमची चर्चा झाली. त्यावेळीं मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला देखील मंत्रिपद मिळावं. आता लवकरच आमची संसदेत 4 संख्या होणार आहे. आम्हाला 1 जागा मिळावी यासाठी विनंती केली, असल्याचं अजित पवार म्हणाले. 

काल त्यांचा आम्हाला मॅसेज आला की शिंदेंना जसा स्वतंत्र पदभार असणारे खाते दिले आहे. तसं तुम्हाला देखील देऊ परंतू आम्हाला तसं नको होतं. आम्ही कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती. लवकरच ती देखील पूर्ण केली जाईल, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

लोकसभा निवडणुकीत कशाचा फटका बसला?

अल्पसंख्याक समाजात एक भीती निर्माण झाली होती, त्याचा फटका महायुतीला बसला. संविधान मुद्दा देखील महत्त्वाचा होता ज्यामुळे लोकांमध्ये भीतीची भावना निर्माण झाली आहे. ती कमी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. मराठा आरक्षण फटका देखील बसला. कापूस दूध सोयाबीन कांदा याचा देखील फटका बसला, असं अजित पवार म्हणाले.   ज्यावेळी अपयश येतं त्यावेळी वेगवेगळे सल्ले दिले जातात. आम्ही त्यावर प्रतिक्रिया दिली की चुकीचे अर्थ निघतात, असं अजित पवार यांनी म्हटलं. 


दरम्यान, पुण्यातील पावसाच्या अनुषंगाने पुणे आयुक्त, पीसीएमसी आयुक्त यांच्याशी सातत्यानं बोलत आहे. पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सरकार म्हणून प्रत्येक खबरदारी घेतली जात आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.  आमच्या पक्षाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धीरज शर्मा यांची निवड करण्यात आली आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं. 

संबंधित बातम्या :

82 ते 83 मंत्री होऊ शकतात, पण राष्ट्रवादीला संधी नाही; अजित पवारांनी सांगितलं नेमकं काय ठरलं, पराभवाचंही बोलले

Panjaka Munde : पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल? बीडमधील मुंडे समर्थकानं संपवलं आयुष्य

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget