एक्स्प्लोर

UP Election: यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात 2017 पेक्षा 3 टक्के मतदान कमी, 58 जागांसाठी झाले 60.17 टक्के मतदान

उत्तर प्रदेशमध्ये काल मतदानाचा पहिला टप्पा पर पडला. या पहिल्या टप्प्यात 58 विधानसभेच्या जागांसाठी 60.17 टक्के मतदान झाले. हे मतदान 2017 च्या तुलनेत 3 टक्के कमी झाले आहे.

UP Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. यामध्ये काल (गुरुवार) उत्तर प्रदेशमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पर पडला. या पहिल्या टप्प्यात 58 विधानसभेच्या जागांवर मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पार पडली. या 58 जागांसाठी 60.17 टक्के मतदान झाले. ही मतादानाची टक्केवारी 2017 च्या तुलनेत 3 टक्क्यांनी कमी आहे. 2017 मध्ये 63.47 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी 58 पैकी 53 जागांवर भाजपने विजय मिळवला होता.

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान?

आग्रामध्ये 60.33 टक्के
अलिगडमध्ये 60.49 टक्के
बागपतमध्ये 61.35 टक्के
बुलंदशहरमध्ये 60.52 टक्के
गौतमबुद्ध नगरमध्ये 56.73 टक्के
गाझियाबादमध्ये 54.77 टक्के
हापूरमध्ये 60.50 टक्के
मथुरेत 63.28 टक्के
मेरठमध्ये 60.91 टक्के
मुझफ्फरनगरमध्ये 65.34 टक्के
तर शामलीमध्ये 69.42 टक्के मतदान झाले.

मागील तीन निवडणुकांची टक्केवारी

काल पहिल्या टप्प्यात 11 जिह्यातील विधानसभेच्या 58 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण मतदानाची टक्केवारी ही 60.17 टक्के आहे. जी टक्केवारी 2017 च्या निवडणुकीपेक्षा 3 टक्के कमी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात 63.47 टक्के मतदान झाले होते. 2012 मध्ये 61.03 टक्के मतदान झाले होते. तर 2007 मध्ये या जागांवर केवळ 48.26 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीनंतर समाजवादी पार्टीचे मुलायम यादव सरकार सत्तेतून बाहेर पडले होते. दरम्यान, उत्तर प्रदेशातील सत्तापरिवर्तनाची दिशा ही पश्चिम उत्तर प्रदेशातून ठरत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पश्चिम यूपी हे खूप महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी पश्चिम यूपीत समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमोर आपली कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जागांसाठीच्या प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली होती. 2017 ते 2022 पर्यंत पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणात बरेच बदल झाले आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे शेतकऱ्यांची भाजपवरील नाराजी. स्वतःला शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणणारे चौधरी कुटुंब यावेळी अखिलेश यादव यांच्यासोबत आहे. 58 जागांपैकी सुमारे 24 जागांवर जाट मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP : महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
महाराष्ट्र भाजपचे आता ‘मिशन बंगाल’, मतदारांना नेण्यासाठी मुंबई ते बंगाल विशेष रेल्वे 
Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली, सांगता सभेला एकाच मंचावर येणार का? म्हणाले...
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget