एक्स्प्लोर

इंजिनिअरिंगचे प्रथम वर्ष दिवाळीनंतर सुरू होणार? CET परीक्षा लेट झाल्यानं प्रवेश फेऱ्यांनासुद्धा उशीर

Engineering First Year Admission : सीईटी परीक्षा उशीरा झाल्याने इंजिनिअर प्रथम वर्षाचे कॉलेज दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई : इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम हा दिवाळीनंतरच सुरू होण्याची चिन्ह आहे. सीईटी परीक्षा उशिरा घेतल्याने त्याचे निकालाला सुद्धा सप्टेंबर महिना उजाडला आहे. खरंतर ज्या महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले पाहिजे  त्या महिन्यात सीईटी परीक्षा झाल्याने इंजिनिअर प्रथम वर्षाचे कॉलेज दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंजिनिअरिंग शैक्षणिक वर्षाचा बट्ट्याबोळ होणार आहे. 

नुकताच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छिणारे जवळपास तीन लाख विद्यार्थी इतके दिवस परीक्षेच्या आणि त्यानंतर निकलाच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी आता प्रवेश फेऱ्यांचा प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रतीक्षा वर प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दिवाळीनंतरच कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.  कॉलेज सुरू झाल्यानंतर अगदी 7 ते 8 महिन्यात प्रथम वर्षाचे दोन्हीही सत्र पूर्ण करायचे आहेत

 राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जूनमध्ये जाहीर झाला. मात्र सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचा निकाल उशिरा जाहीर झाल्याने  जुलै - ऑगस्ट महिन्यात  इंजीनिअरिंग प्रथम वर्ष कॉलेज सुरू व्हायला हवं त्या महिन्यात सीईटी परीक्षा घेतल्या गेल्या. त्यानंतर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर झाला आहे. तर ऑक्टोबर मध्ये प्रवेश फेऱ्या पूर्ण होऊन नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कॉलेज सुरू होण्याची चिन्ह आहेत

नेमका इंजिनिअरिंग प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कसे असते?

  • मे जून महिन्यात सीईटी इंजिनिअरिंग परीक्षा आणि निकाल
  • जुलै ऑगस्ट महिन्यात इंजिनिअरिंग प्रथम वर्षाला सुरुवात
  • दिवाळीनंतर डिसेंबर जानेवारी महिन्यात इंजिनिअरिंग प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा पूर्ण होतात
  • प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून मे जून  महिन्यात द्वितीय सत्र परीक्षा पूर्ण होऊन प्रथम वर्ष पूर्ण होतं

त्यामुळे आता डिसेंबरमध्ये इंजिनिअरिंग प्रथम वर्ष सुरू झाल्यानंतर सहा ते सात महिन्यात दोन्ही सत्रांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिक्षकांना पूर्ण करायचा आहे.  हे शिक्षकांसमोर  खूप मोठे आव्हान असणार आहे. इंजीनिअरिंग प्रथम शैक्षणिक वर्ष हा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा असतो. इंजीनिअरिंग कॉलेजच्या वातावरणात समरस होण्यासाठी आणि आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी प्रथम वर्षाचा काळ इंजिनिअरिंग मध्ये महत्त्वाचा मानला जातो. मात्र प्रथम वर्ष अर्ध्या वेळेत पूर्ण करावं लागणार असल्याने विद्यार्थ्यांचं मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे

मागील वर्षी कोरोनामुळे इंजीनियरिंग प्रथम वर्ष अभ्यासक्रम उशीरा सुरू झाल्याने जो बट्ट्याबोळ झाला तो सलग दुसऱ्या वर्षी होत आहे. वर्षभराचा अभ्यासक्रम सहा महिन्यात पूर्ण कसा करायचा असा प्रश्न प्राध्यापकांसोबत विद्यार्थ्यांसमोर सुद्धा 'आ' वासून उभा राहणार आहे. आता या आव्हानात्मक परिस्थितीतून विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पूर्ण करायचे आहे आणि त्यासाठी दिवाळीनंतर पूर्ण ताकदीने तयार राहायचं आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget