Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Jalgaon Crime News: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला होता.

Jalgaon Crime News: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 26 एप्रिल रोजी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली. बुलढाणा पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाली की, खगनार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खडकी गावातील 26 वर्षीय शिवानी कळमेकर (Shivani Kalmekar) बेपत्ता आहे. पोलिसांना वाटलं हा मृतदेह शिवानी कळमेकरचा आहे. त्यामुळे त्यांनी शिवानीचे वडील बापूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांना शिवानीच्या हत्येच्या संशयावरून ताब्यात घेतलं. दोघांना जळगाव जामोद न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली. (Jalgaon Crime News)
पोलिसांनी न्यायालयाला दोघांनी शिवानीची हत्या आम्हीच केल्याचं कबूल केल्याचं सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवलं. दोघेही न्यायालयीन कोठडीत असताना अचानक 28 मे रोजी शिवानीने खगनार पोलिसात हजर होऊन मी जिवंत असल्याचा जबाब दिला. बुलढाणा पोलिसांनी कुठल्याही पुराव्या अभावी व फॉरेन्सिक अहवाल येण्याच्या अगोदरच अनोळखी मृतदेह शिवानीचा असल्याचं जाहीर करून टाकलं. (Jalgaon Crime News)
20 दिवासांनी शिवानी पोलिसात स्थानकांत हजर, सगळे चक्रावले- (Jalgaon Crime News)
दरम्यान वीस दिवसानंतर 28 मे रोजी शिवानी जळगाव जामोद पोलिसात हजर होऊन मी जिवंत असून माझ्या वडिलांना व भावाला मुक्त करा अशी मागणी केली. 29 मे रोजी पोलिसांनी शेगाव न्यायालयात शिवानी जिवंत असून तिच्या हत्याकांडप्रकरणी कारागृहात असलेले तिचे वडील बाबूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांच्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शेगाव न्यायालयाने दोघांनाही दोषमुक्त केल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली. त्यामुळे आज त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
अनोळखी व अर्धवट जळालेला मृतदेह कोणाचा? (Jalgaon Crime News)
दरम्यान बुलढाणा पोलिसांनी निर्दोष व न झालेल्या हत्येच्या प्रकरणात बाप लेकांना कारागृहात ठेवलं यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. बुलढाणा पोलीस अद्यापही अनोळखी व अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवू शकलेले नाहीत, सध्या त्या मृतदेहाबद्दल बुलढाणा पोलिसांचे हात खाली आहेत. इतक्या मोठ्या प्रकरणात अद्यापही जिल्ह्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्याने यावर भाष्य केलं नाही. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात आता पर्यंत थातूरमातूर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या चार कर्मचाऱ्यांना मुख्यालय जमा केल आहे. आता या प्रकरणातील अर्धवट जळालेल्या महिलेची ओळख पोलीस कसे पटवतात हे बघणं महत्त्वाचं आहे.
सदर संपूर्ण घटना क्रमावर "एबीपी माझा" चे काही सवाल- (Jalgaon Crime News)
1- कुठलाही सबळ पुरावा नसताना बुलढाणा पोलिसांनी आदिवासी समाजाच्या पिता-पुत्रांना का अटक केली..?
2- डीएनए अहवाल यायच्या आधीच तो मृतदेह शिवानीचाच आहे असा अंदाज पोलिसांनी कसा बांधला...?
3 - पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केल्यानंतर न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती या सहा दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला..?
4- अनोळखी मृतदेहाची ओळख पटविल्याविनाच पोलीस निष्कर्षावर कसे पोहोचले...? त्यांचा काय हेतू होता..?
5- अनोळखी मृतदेहाचं प्रकरण दडपण्यासाठी तर शिवानी बनावट हत्याकांड घडवून आणलेलं तर नाही..?, याव्यतिरिक्तही या प्रकरणात अनेक सवाल उठतात. मात्र सध्या तरी बुलढाणा पोलीस दलातील कुठलाही वरिष्ठ अधिकारी यावर बोलण्यास तयार नाही.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:






















