एक्स्प्लोर

Buldhana Crime : फिर्यादी म्हणतोय, बलात्कार झाला, मात्र 'ती' म्हणते, असं काहीच झालेलं नाही; बुलढाणा सामूहिक बलात्कार प्रकरणाला नवं वळण

Buldhana Crime News: फिर्यादी म्हणतोय, बलात्कार झाला, मात्र 'ती' म्हणते, असं काहीच झालेलं नाही.बुलढाण्यातील सामूहित बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण.

Buldhana Crime News: बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात एका 34 वर्षीय महिलेवर आठ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला होता. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी अज्ञात आठ आरोपींविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. महिलेसोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वतः या भागाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोरखेडी पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या मांडून हा गुन्हा पुन्हा दाखल करून घेतला होता. पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. हे वृत्त पसरताच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. पोलीस तपासात तशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता माझ्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही. फक्त आरोपींनी आमच्याकडील पैसे, मोबाईल आणि आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची आणि समाजात बदनामी करण्याची धमकी दिली, आरोपी तिथून निघून गेले, असं या 34 वर्षीय महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. लैंगिक अत्याचार झालेलाच नाही. त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीचीही गरज नाही, असं या महिलेनं पोलिसांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना लिहून दिलं आहे.

घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तीन तास ठिय्या?

या घटनेनंतर बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तात्काळ बलात्काराचा गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी बोराखेडी पोलीस स्थानकात रात्री तीन ते चार तास ठिय्या मांडला होता. यावेळी पोलिसांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना संजय गायकवाड यांनी चांगलंच धारेवर धरलं होतं.

पीडित महिला काय म्हणाली?

गुन्हा दाखल झाल्यानंतर आज दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, न्याय वैद्यक पथकानं आणि श्वान पथकानं घटनास्थळी तपास केला. त्यानंतर पोलिसांनी सदर महिलेच्या घरी जाऊन महिलेचा जबाब नोंदवून घेतला. या जबाबात महिलेनं म्हटलं आहे की, "काल दुपारी दोन वाजता आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी करून टेकडीवर आम्ही बसलो. त्यावेळी तिथे आठ जण आले. त्यांनी आम्हाला घेरलं. सोबतच्या पुरुषालाही मारहाण केली. त्या आठ जणांचे चेहरे रुमालानं बांधलेले होते. आमच्याकडून त्यांनी पैसे आणि मोबाईल घेऊन ते तिथून निघून गेले, त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकीही दिली. आरोपींनी कोणताही लैंगिक अत्याचार केलेला नाही. त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची गरज नाही, असंही महिलेनं वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. सदर जबाब पोलिसांनी नोंदवून घेतलेला आहे.

सत्य समोर कसं येणार?

राजूर घाटात झालेल्या या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळणं लागलं आहे. महिलेसोबतच्या पुरुष नातेवाईकानं तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र महिला सांगते माझ्यावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही. असे दोन वेगवेगळे जबाब समोर आल्यानंतर संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र पोलिसांनी अजूनही तपास थांबवलेला नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळणार? की सत्य बाहेर कसं येणार? आणि कधी येणार? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी होणार का? जर बलात्कार झालाच नाही तर सोबतच्या पुरुषानं बलात्काराची तक्रार का दिली? आमदारांनी त्या ठिकाणी गोंधळ घालून पोलिसांवर दबाव आणून पुन्हा दाखल करायला का लावला? का त्या महिलेवर किंवा पुरुषावर राजकीय फायद्यासाठी काही लोकांनी दबाव आणला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात समोर येतील अशी अपेक्षा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget