एक्स्प्लोर

210 रुपये गुंतवा अन् वर्षाला मिळवा 60 हजार रुपये, जाणून घ्या सरकारची 'ही' भन्नाट पेन्शन योजना आहे तरी काय?

What is Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयुष्याच्या उत्तरार्धात तब्बल 5000 रुपयांपर्यंत प्रतिमहा पेन्शन मिळू शकते.

Atal Pension Yojna : आयुष्याच्या उत्तरार्धात उत्पन्नाचा ठोस स्त्रोत नसल्यामुळे काही लोकांची फार आबाळ होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. तरुण असताना अनेकजण आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी पैसे लावतात. पण म्हातारपण आल्यावर आर्थिक गरजा कशा भागवायच्या? याचा विचारच अनेकजण करत नाहीत.  पण तुमच्यासोबतही असंच घडू नये म्हणून म्हणून योग्य वेळी योग्य काळजी घेणे गरजेचे आहेत. म्हातारपणी नियमतिपणे पैसे मिळावेत यासाठी तुम्ही आतापासूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर तुमचे म्हातारपण सुरक्षित व्हावे. तुम्हाला पैशांची अडचण येऊ नये म्हणून सरकारच्या एका भन्नाट स्कीमबद्दल जाणून घेऊया...

तुम्हाला मिळू शकेल 5000 रुपयांचे पेन्शन

केंद्र सरकारतर्फे अटल पेन्शन योजना चालवली जाते. देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात पैशांची चणचण भासू नये म्हणून सरकारने ही योजना चालू केलेली आहे. या योजनेमुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला पेन्शनच्या रुपात प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळत राहील. तुम्ही 18 वर्षे वयाचे असताना या योजनेत गुंतवणूक चालू केली तर तुम्हाला वर्षाला पेन्शन म्हणून तब्बल 60 हजार रुपये मिळू शकतात. उदाहरणासह सांगायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत गुतवणूक चालू केली असेल तर वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला 5000 रुपये म्हणजेच वर्षाला 60 हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच वयाच्या साठीनंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये हवे असतील तर तुम्हाला 18 वर्षांचे असताना रोज फक्त 7 रुपये गुंतवावे लागतील. 

अटल पेन्शन योजनेची अट काय? 

अटल पेन्शन योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीला 18 ते 40 वयापर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंत वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीनुसा तुम्हाला 1000 ते 5000 रुपयांच्या तुलनेत तुम्हाला मासिक पेन्शन मिळते. पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनची रक्कम संबंधित व्यक्तीच्या जोडीदाराला दिली जाते. 

1000 रुपयांचे पेन्शन हवे असेल तर किती गुंतवणूक करावी लागेल? 

तुम्हाला या योजनअंतर्गत 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं. मुळात तुम्ही या योजनेत जेवढे जास्त रुपये गुंतवाल तुम्हाल तुमच्या 60 वर्षांनंतर तेवढेच जास्त पेन्शन मिळेल. तुम्हाला 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळऊ शकते. तुम्हाला वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक चालू केली असेल आणि वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1000 रुपयांचे पेन्शन हवे असेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला फक्त 42 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
यासोबतच तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी महिन्याला 5000 रुपयांचे पेन्शन हवे असेल तर 18 वर्षांचे असताना तुम्हाला महिन्याला 210 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 

हेही वाचा :

गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, नेमका का घेतला निर्णय?

कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी आक्रमक, येवला बाजार समितीत कांद्याचे लिलाव पाडले बंद 

मोठी बातमी! आयफोन 15 वर बम्पर सूट, महागडा फोन स्वस्तात मिळणार, 70 हजार नव्हे तर फक्त 'इतके' रुपये लागणार

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget