एक्स्प्लोर

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील अर्थसंकट; भारत-श्रीलंका व्यापार ठप्प, भारतीय व्यापारी चिंतेत

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील अस्थिरतेचा परिणाम भारतासोबतच्या व्यापारावरही होत आहे. श्रीलंकेतील संकटामुळे भारतीय निर्यातदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत सुरू असलेल्या आंदोलनामुळे (Sri Lanka Crisis) मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. आर्थिक संकटाच्या परिणामी देशात नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. या अस्थिरतेचा फटका भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा (India Sri Lanka) व्यापार ठप्प झाला आहे. तर, दुसरीकडे भारतीय निर्यातदारांची चिंता वाढली आहे. श्रीलंकेत निर्यात केलेल्या वस्तूंचे पैसे अद्यापही न मिळाल्याने मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. 

श्रीलंका आतापर्यंतच्या अभूतपूर्व आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. देशातील नागरिकांना अन्नधान्य, औषधे, इंधनांच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातून नागरिकांमध्ये सरकारविरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. 

भारतीय निर्यातदारांची संघटना 'फियो' चे उपाध्यक्ष खालिद खान यांनी सांगितले की, श्रीलंकेतील अस्थिरतेच्या परिणामी निर्यात आणि आयात पूर्णपणे ठप्प झाली आहे. राजकीय संकट आणि आपल्या थकित देयकांबाबत निर्यातदार अधिक सावध झाले आहेत.  श्रीलंकेत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर स्थितीत अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे. 

फियोचे अजय सहाय यांनी सांगितले की, राजकीय स्थिरता आल्याने व्यापार पुन्हा एकदा सुरू होण्यास मोठी मदत मिळेल. उद्योगांसाठी कच्चा माल, औषधे, उर्वरक, खाद्यान्न आणि कपडा आदींची निर्यात करण्यात आली आहे. 

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये भारतातून श्रीलंकेत 5.8 अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली होती. या वर्षी एप्रिलमध्ये हा व्यापार 55 कोटी डॉलर इतका झाला होता. मागील आर्थिक वर्षात एक अब्ज डॉलरची आयात करण्यात आली होती.  तर, एप्रिल 2022 मध्ये 7.4 कोटी डॉलरची आयात करण्यात आली होती. भारत आणि श्रीलंका दरम्यान वर्ष 2000 मध्ये मुक्त व्यापार करार झाला होता. 

मुंबईतील निर्यातदार आणि टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी सांगितले की, व्यापारात मोठी घट झाली आहे. जानेवारीपासून श्रीलंकेसोबत आमचा व्यापार 25 टक्क्यांनी घटला आहे. तेथील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Embed widget